तो कागद घेउन समोर आला की मला दे माय
धरणी ठाय होतं.मी कवी असल्याचा त्याचा मोठाच गैरसमज आहे,
तो स्वतःही कवी असल्याचा त्याला साक्षात्कार का काय झालाय म्हणे.
तो माझ्या कविता लाईक करतो त्यावर कमेंटस करतो म्हणुन मिही त्याच्या कविता लाईक करुन
त्यावर प्रशंसात्मक कमेंटस द्याव्यात किंबहुना ते माझ कर्तव्यच असल्याच त्याला प्रकर्षानं वाटतं, म्हणुन
तो मला कवितेत टॅग करतो,(मिही त्याला टॅग करायचा गाढवपणा कधितरी केला होता हो.)
मला कविता मेसेज,मेल करतो नाहितर कागद घेउन येउन माझी गचांडी धरुन
मला ऐकवतो. त्याचं फेसबुक खातं आहे ' एक
प्रेमप्यासा फेसबुक रोमीयो'(सगळ्या मुलखाचे फेक खाते त्याला ऍड आहेत)
आणि मागे रात्रीबेरात्री तो जिच्यासोबत चॅटिंग
करायचा ते त्याच्याच एका आगाऊ मित्राच फेक खातं होतं हे कळल्यावर त्याचा सतराव्यांदा दिल तुटुन
अठराव्यांदा त्याचा प्रेमभंग झाला होता, त्याचा दर्द फारच होऊन गम म्हणुन त्यानं दोनदा गायछाप तंबाखु खाल्ली.(दारु सिगरेट प्यायला त्याच्याजवळ पैसे नव्हते). तर प्रेम ही अनुक्रमे अत्यंत तरल आणि पवित्र भावना आहे असं त्याला अत्यंत कळकळीन वाटतं आणि तो ख-या प्रेमाच्या शोधात असल्याच त्यान
कैकदा मला डोळ्यात पाणि आणुन सांगितलयं.. त्याच्या काव्यप्रतिभेचा एक
अलौकीक नमुना मी खाली देत असलेली कविता...
प्रिये तुझी याद...
अशी 'हरदया' मध्ये जागली..
तिव्रतेन जणु हागवण लागली...
रेंगाळते याद तुझी
मनी माझ्या मैलन मैल
तुझी याद तरल अशी
जणु एरंडेल तैलं....
(टेम्पो चेंज)
प्रिये आठवते मला
तुझं बोलणं हासणं..
तुझं रुसणं अन्
रुमालाने हळुचं
तुझं ते शेंबुड पुसणं....
(टेम्पो चेंज)
प्रिये तुझी याद
मुळव्याधिचं दुःखणं गं..
रात्रिबेरात्री गाढवान
जणु उकिरडे फुकनं गं..
(कवि प्रेमप्यासा)
टिप- अक्षरमर्यादेमुळ कवितेच रसग्रहण
लांबणीवर टाकत आहोत.
आपला
महेंद्र कांबळे.