लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

परत एकदा.

अजुन का स्मरतो मजला
तो तूझा उन उन श्वास
अजुन का दारास दुपारी
सतत चांदण्यांचे आभास.

अजुन पुरता मेलो नाही
थोडा बहूत जीवंत आहे
अजुन मनाच्या कोपर्यात त्या
थोडा थोडा वसंत आहे.

वठलेले जरी झाड जाहलो
परत नव्याने होईन हिरवा
उरातली विसरून भैरवी
परत आता छेडीन मारवा.

परत एकदा लिहिन कविता
डोळ्यामधले पुसून पाणि
हरफ हरफ जुळवीन नव्याने
तुझ्यावरतीच लिहिन गाणी......

महेंद्र गौतम.

कविता असते.

कविता असते द्रोह...
कविता जाळ असते....
कविता कधी कधी.....
फुलांची माळ असते....

महेंद्र गौतम.

एका हळव्या क्षणी म्हणाली..

���एका हळव्या क्षणी म्हणाली
डोळ्यामध्ये आणून पाणि
इथवर होती साथ आपूली
सरली राजा इथे कहाणी

तुझ्यासवे रे मला  मिळाले
जगणे जैसे युगायुगाचे
फुलपाखराच्या पंखाना
स्वप्न दिले रे तूच नभाचे

तुझ्यासंगचे धुंद धुंद क्षण
दाटून येतील कधीही पटकन
घरभर होतील काचा काचा
अन डोळा पाणी रे टचकन

गळाभेट अन अंगुल गुम्फन
डोळ्यामध्ये हरवून जाणे
उगीच म्हणने नको नको ते
सारे असती लुळे बहाणे

वेडा रा�जा आता जगतो
स्वप्नाच्या उध्वस्त महाली
ओल्या अगतिक कविता आणि
शब्दांच्या वाहतो पखाली

वेडा राजा वेडी राणी
त्यांची ही वेडीच कहाणी
येता जाता वारा गातों
का त्यांच्या विरहाची गाणी?

एका हळव्या क्षणी म्हणाली
डोळ्यामध्ये आणून पाणी
इथवर होती साथ आपुली
सरली रजा इथे कहाणी.......

महेंद्र गौतम.

वंचनेची वंचना......

तुझ्या मंदिराची मला पायरी कर.
कधी गाभा-याची अपेक्षा मी केली......
सर्वस्व वाहून तुझ्या चरणावरती
नेहमी तू माझी उपेक्षाच केली....

अलवार वाजे कुठे दूर मुरली
व्याकुळ झाली तिची ती न उरली.....
जरा काळजी ना तिच्या सावळयाला
नशिबी मिरेच्या विषाचाच प्याला......
महेन्द्र गौतम.

सैरभैर…

किरमिजी सांज अस्तमान सूर्य
आणि अंगावर येणारी कातरवेळ
अधिरलेले श्वास पावलांचे भास
पापणीत थांबलेले थेंब.
मोकळ्या हवेसाठी ग्यालरीत याव
तर रस्त्यात हात गुंफून
बेहोष चालणारे दोन जीव…
मग हृदयाच्या फडताळाच्या तळाशी
दाबून ठेवलेली वेदना
एकाएकि उफाळून येते वर
आणि आठवतात…….
त्या फुल्यांच्या रात्री ते अत्तरांचे दिवस
ते घरावरले मेघ तो दारावरचा पाऊस
मग क्षण खिन्न होऊन ओथंबतात
परसातला मोगराही होतो मलूल
निघतांना किमान "येते"……
एव्हढतरी म्हणायचं होतस ग…!!!!
महेंद्र गौतम…

बाजार.


नाही ग ……
विकत नसतो तो तिला
आत्मजाच असते ती त्याची
आहेच भूक एक शाश्वत तथ्य.
तरीही……
तरीही नसतो विकत तो तिला
तर दुसर्याच्या हाती फक्त सोपवतो
तेही तिच्याच पूर्णत्वासाठी……
आता समोरच्यान केलच तिचं अवमूल्यन
तर त्यात त्याचा काय दोष….
म्हणून अंतकरणातून विनवतो
बापाच्या काळजाची तडफड जर समजून घे ……
महेंद्र गौतम

गाऊ चांदण्याच गाण...

अवघड जरी घाट
अवघड उतरण
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण

तप्त दग्ध अशी धरा
देऊ श्रावणाच्या धारा
ठेऊ हसरा चेहरा
नको सजल नयन
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण

माझ्या मनाच कोंदण
तुझ्या प्रितीच चांदण
तुझ्या प्रेमाचा सहारा
आणि सुख पखरण
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण

दुखप्रद जरी जीण
उभ आयुष्य दोलन
तुझी साथ असे मला
वाळवंटी मरुद्यान
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण…
महेंद्र गौतम.

निनादते घंटा

निनादते घंटा
रोज तुझ्या दारी
भार असा शिरी
टाकीला का?
चढविले रोज
पायी तुझ्या फूल
तूच अशी हूल
का रे दिली?
ऊर जड माझा
श्वास जड माझे
पाठिवर ओझे
वाहू कैसे?
नाद ताल गेला
सांगू कसे तुला
सुर हरवला
जिवनाचा
दुभंगली भुई
कोणी वाली नाही
डोळा पाणी वाही
सारखेच
रोजच पडते
दुखाःत या भर
अंत आता कर
वेदनेचा.
महेंद्र गौतम.

'जगायचं' कधी मगं...?

आयुष्य म्हणजे काय बुध्दिबळाचा पट असतो का राव?
प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकणं, समोरच्याचा अंदाज घेतं पुढचं प्लॅनींग करणं.. मान्य आहे बाबा चौकसपणा हवा, जगण्यात शिस्त हवी. काहितरी मिळवण्यासाठी या गोष्टी आवश्यकच.
पण एखादा सहज जरी वागला काही बोलून गेला तरी रात्रभर दिवसभर हा असाच का बरं वागला असेल असा विचार करत बसायचं? डोक्याची वाट लावून घ्यायची?
अन् म्हणे अचीव्हर्स असेच वागतातं...
चोवीस तास असच रहायचं....
मायला 'जगायचं' कधी मगं...?

पावसाकड पाहुन.....

मस्त रिमझीम सुरू होती. थंडगार रोमँटिक हवा, अश्यावेळी चहा भज्यांचा माहोल तो बनता ही है.. आम्ही कँटिनमध्ये घुसलो.
'अज्जु तिनं भजे.... गरम'
तो खिन्नशी मान हलवत पाय ओढतं कढाईकडे हातात तिन प्लेट घेऊन निघाला. मी मनात म्हटलं काहितरी बिनसलय याच आज नेहमीसारखा प्रसन्न नाही दिसतं.. भजे संपता संपता मी परत ओरडलो 'अज्जु तिन काँफी तुझ्याहातची स्पेशलं' त्याचा चेहरा मलुलचं..
एवढ्यात काऊंटरवाला मामा त्याच्याजवळ गेला.
अज्जु एव्हढी काँफी बनव आणि तू दोन एक घंट्यासाठी घरी जाऊन आराम करं. कोप-यात छत्री आहे भिजत नको जाऊ. त्याचा चेहरा फुलला पटकन वाफाळती काँफि माझ्यासमोर ठेवली तेव्हा डोळ्यात भारी चमक होती त्याच्या. तो आनंदाने उड्या मारत निघून गेला. कौंटरवाला मामा हळूच माझ्या जवळ येत म्हणाला 'कसय नवनवच लगन झालै त्याचं, पावसाकड पाहुन उगीच चुकचुक करित व्हता म्हणून दिलं पाठवुनं.. एक डोळा मारत मामा पुढ म्हणाला..
'आरं आम्हिय कव्हातरी नवेतरणे व्हतोच की'.
आम्हि तिघं हसलो..
आजची काँफी मात्र नेहमीपेक्षा जरा जास्तच कडक होती..

आपण सगळे गांडूळ गांडूळ...


हा माझा भारत आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व, सहिष्णुता यांचा पुळका आणनारा.
२०२० मध्ये महासत्ता होण्याचा आव आणनारा……….
इथे शोषणाविरुद्ध विधायक मार्गाने लढणार्याला डोक्यात गोळ्या खाव्या लागतात…
आणि अनुष्ठानाच्या नावाखाली कोवळ्या मुलींचं शोषण करणार्या छी** बाबासाठी जेलभरो होत, त्याची निर्लज्ज पाठराखण केली जाते.
भारत म्हणजे मी
भारत म्हणजे तू
भारत म्हणजे 'आपण'……….

-----------------------------------------------------------------------------------------------------------
मी एक गांडूळ तू एक गांडूळ
तो एक गांडूळ ती एक गांडूळ
आपण सगळे गांडूळ गांडूळ

मड पडेतो खाणारे गांडूळ
घाणीतच राहणारे गांडूळ
मरता मरता या दुनियेला
पौष्टिक खत देणारे गांडूळ
आपण सगळे गांडूळ गांडूळ

बाबा, बुवा, मा,अम्मां, बापु.
सा-यांना भजणारे गांडूळ
खादी खाकी करी कुरघोडी
सुखे घरी निजणारे गांडूळ.
आपण सगळे गांडूळ गांडूळ
--------------------------------------------------

गांडूळाना नसतो धर्म
गांडूळाना नसते जात
कोणी यावे चिरडून जावे
गांडूळाना नसती दात

वादळानो एक व्हा रे
बारुदानो पेट घ्या रे
गांडुळानो नाग व्हा रे
गांडुळानो नाग व्हा रे….
(गांडूळांचे पुन्हा नाग होऊ दे या आगामी दणक्यांच्या संग्रहातून )
महेंद्र गौतम….

तरक्कीपसंद गझल..

आताच लाविली मी शब्दास धार आहे.
बंडासवेच माझा झाला करार आहे.
आता मला हवासा दे घाव तू कसाया.
तो घाव झेलण्याला हा मी तयार आहे.
बोटात टोचणारा काटाच जाहलो मी.
ही बाग सोडण्याचा माझा विचार आहे.
गेलेत माजुनिया खाऊन कोळसा हे.
देशात आज माझ्या दाता फरार आहे.
आहेस ना खरा तू? मग बोल ना जरा तू.
गांडूळ या जिण्याला माझा नकार आहे.
महेंद्र गौतम.

सृजन सोहळा… वेगवेगळ्या रंगात भेटणारा पाऊस...

तो या वर्षी बेछूट बरसतोय. पण सतत मुसळधार बरसण्याचा कधी त्यालाही कंटाळा येतोच की, मग तो जरा मंद मंद भुरभुरतो. अन् अश्यावेळी 'त्याला' वाटत 'तिनं' जवळ असावं,
जरा सोबतीनं हे भुरभुरतं पाऊसगाणं ऐकावं. पण ती तर कमालीची 'बिझी'. सासू, सासरा, दिरं सगळ्यांचं तिलाच तर करावं लागतं. मग तो जरा खट्टूच होतो, कुरकुरतो. पण ती म्हणते समजुन घे,
गेल्या साली दुष्काळाच्या किती झळा सोसल्यातं, प्यायच्या पाण्याची वाणवा, जिवं की प्राणं असणार गोधनं छावण्यात ठेवावं लागलं. आता सगळं चैतन्य पावसाच्या रुपात परतलयं.
आता मुबलक मिळणार पाणि एकदा भरुन घेऊदे मग मी येतेच.. तोवर जरा थांब.
1.
भुरभूर पावसाची
कुरकुर साजणाची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची.

आत सासू खोकणारी
अन दीर बसे दारी
हव सासूला हि पाणी
आणि दिराला भाकरी
सोडी सासरा 'ऑर्डर'
मला चहा करण्याची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची.

माझ्या मनातही राजा
नाचे श्रावणाचा मोर
समजाऊ तुला कशी?
लागे जीवाला हा घोर
भाषा समजून घेणा
जर माझ्या नयनाची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची.

गेल्या साली तू रुसला
अन दुष्काळ मातला
होता सुना सुना गोठा
आणि सुन्न सुन्न ओटा
थांब थांब रे सजना
वेळ पाणी भरण्याची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची…….
(महेंद्र गौतम.)
अहो तो एकाएकीच मुसळधार आला काल, बिचारीला काही उमगलचं नाही. रानात आडोसा तरी कुठं शोधणार ती? आता भिजण्याशिवाय कुठला पर्यायचं नाही ठेवला पावसानं.
पण गोष्ट ईथच थांबत नाही. त्या भर पावसात सजणान एकांतात तिला गाठलं आणि मग ती नको नको म्हणतांना ते दोघेही बरसत राहीले अगदी बेभान होऊन....

२. तृप्त पाऊस…
बाई पिसाटला वारा
अन रान पिसाटल
भर पावसात काल
सजनान गाठीयल

विद्दुलता कडकली
आत आग भडकली
त्यान फुंकर मारून
फुल कळीच का केल?
भर पावसात काल
सजनान गाठीयल.

कशी अतृप्त तृषार्त
होती भेगाळली माती
त्यान तृप्त तृप्त केलं
सार रान भिजवलं
भर पावसात काल
सजनान गाठीयल.

असा रानात पाऊस
पानापानात पाऊस
पावसाने आनंदाच
दान ओंजळीत दिल
भर पावसात काल
सजनान गाठीयल…
(महेंद्र गौतम)

पाऊस प्रत्येकात सृजनशक्ती जागवतो, ईतरांसारखाच 'त्याच्याही' चेह-यावर पाऊस प्रसन्नता फुलवतो.. पण माझा पाऊस वेगळा अन् त्याचा वेगळाचं.
माझा पाऊस हळुवार, रोमँटिक तर त्याचा रांगडा धुवाँधार. मला पाऊस कल्पना देतो तर त्याला नवी उमेद.
सजल काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ वेढल्यावर त्याचे बाहु फुरफुरतात, कष्ट करायला तो आसूसतो. तो झिंगतो, रानं हिरवं करायच्या वेडानं अक्षरशः 'पेटतो'..

३. ऋतू सृजानाचा .….

थेंब थेंब पावसाचा
कसा साठला ढगात
बघ उरूस थेंबाचा
कसा चालला नभात.

कस अंधारून आल
दाट दाटलं आभाळ
राणी उरातही माझ्या
अस पेटलं आभाळ

थेंब थेंब बरसला
जीव शिवरास आला
पीस वेचू सतरंगी
मोर-नाचनीला चला.

आता करूया पेरणी
करू काम गळू घाम
रान करूया हिरव
घेऊ घामाचा या दाम

पाडू पाऊस कष्टाचा
गळू घाम निढळाचा
असा देखणा पाऊस
असे ऋतू सृजानाचा .
(महेंद्र गौतम)

दरवेळी काही पाऊस रोमँटिकचं असतो अस नाही. एखादा पाऊस उद्विग्नही असतोचं की, नेहमीच काही तो आनंद घेऊन येत नाही. कधी ठसठसणा-या जिवघेण्या वेदनाही आणतो.
गतकाळातल्या सुखद भिज-या आठवणी देऊन कुणाला तरी पाऊस काळीज-चटका होऊन भेटतो. मग थेंब अंगावर आल्यावर कुणीतरं पोळंत ओल्या ओल्या पावसात अक्षरशः होरपळतं..
मग अश्यावेळी डोळ्यातला पाऊस अनावर होतोचं ना?

४. पोळता पाऊस

मी दिवस दिवस तपताना
धून वैशाखी जगताना
तो दाटून दाटून येता
मी सावर सावर म्हणतो
तो सरळ मनावर येतो
डोळ्यात कधी मग माझ्या
पाऊस अनावर होतो

पाऊस गजाबाहेरचा
आत मैना केविलवाणी
उध्वस्त राघूच्या ओठी
का व्याकुळतेची गाणी
ती कोसळ कोसळ म्हणता
तो ठन्न कोरडा जातो
डोळ्यात कधी मैनेच्या
पाऊस अनावर होतो

ती याद जुन्या दिवसांची
पाऊस घेउनी येतो
कुणी शापीत वेडा प्रेमी
अस्वस्थ उगीचच होतो
मग थेंब थेंब रे त्याचा
त्या मरण यातना देतो
डोळ्यात कधी वेडयाच्या
पाऊस अनावर होतो.
महेंद्र गौतम.
९४०५७०६६१२.
(आवडल्यास नक्की पोच द्या आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेल्या कवितेचा क्रमांक कमेंट मध्ये पोस्ट करा.)

पाऊस अनावर होतो..

मी दिवसं दिवसं तपतांना
धुन वैशाखी जगतांना
तो दाटून दाटून येता
मी सावर सावर म्हणतो
तो सरळ मनावर येतो
डोळ्यात कधी मग माझ्या
पाऊस अनावर होतो...
(अनावर या आगामी संग्रहातून)
महेंद्र गौतम.

हासता मी..!!

अंतरात ही अशी कळ
सांग का उठली जरा?
हासता मी वेदनेला
पालवी फुटली जरा.
हासता मी लाजली ती
धुंद का झालो असा?
सांग 'मोहा' सांग ना रे
ही नशा कुठली जरा.?
वंचनेची वेदना अन्
वेदनेची वंचना
हासता मी कुट्ट काळी
वंचना सुटली जरा.
दु:ख दाटे खिन्न वाटे
शुष्कता अन् खिन्नता
हासता मी ही जगाची/ (जिण्याची)
काळजी मिटली जरा.
महेंद्र गौतमं.

रसास्वाद....

मळलेल्या वाटा सोडून काही 'हटके' करणं भन्नाट जरी असलं तरी अस हटके करण्याचीही एखादी हटके पध्दत काही हुन्नरी माणस शोधतातं किंवा आपसुक त्यांना ती त-हा गवसते. औरंगाबादचे कवी श्रि. "रमेश ठोंबरे" या अश्याच एका 'हटके' माणसाचं 'प्रियेचे अभंग' हे असचं एक हटके पुस्तक वाचणात आलं आणि आईशप्पथ मजा आली. विशेष म्हणजे अभंगासारख्या पवित्रतम् छंदप्रकाराला कुठेही किंचीतसुध्दा गालबोट न लावता त्यांनी हे प्रियेचे तुफान अभंग रचलेतं.तसं हे पुस्तकं म्हणजे 'एकटेने वाचनेकी चिज नैच है.' मस्त चारसहा रसिकमित्र जमवावेत अन् उत्तेजक पेय( जसे चहा काँफी वगैरे) घेत घेत मैफिल जमवावी असं हे पुस्तकं. रमेशजी त्यांच्या 'कंपूत' महाराज या नावाने प्रसिध्द आहेत कारणं त्यांचे हे प्रियेचे अभंग.
आणि त्यांची प्रिया म्हणजे…
'सोन्याहुन सोनसळी
फुलाहुन गोड कळी
कधी अफुचीच
गोळी प्रिया माझी'
त्यांच्या या 'अफुच्या गोळीने' वाचक चांगलाच झिंगतो.. प्रांजळपणा या पुस्तकाच्या पानोपानी दिसतो..
'अभंगात माझ्या
प्रियेचीच भक्ती
प्रिया हिच शक्ती
मजसाठी.'
" उगीच ताक को जाके मडकं लपवनेका परकार" कविने कुठचं केला नाही म्हणुन तो परमेश्वराला स्पष्ट म्हणतो
'माफ कर देवा
माझा भक्ती होरा
आहे जरा न्यारा
जगाहुन.'
अहो प्रेम जर जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट असेल तर प्रियेला ईश्वर मानुन तिची आराधना करण्यात गैर ते काय? कविची प्रियाच नाही तर तिचा आरसासुध्दा ईथे भावं खातो कधी आपल्याला प्रियेला बिलगण्या आतुर झालेला 'उपाशी' पाऊस भेटतो तर कधी चावट चंद्रसुध्दा.
'प्रियेवर चंद्र
पुरताच फिदा
देखे सदा कदा
प्रियतमा'
पुढे या चंद्राचे लोचे बघा……।
'आजही करीतो
वेगळाच लोचा
छतावरी तिच्या
रेंगाळतो.'
"परी तो खट्याळ
लोचटही फार
प्रियेचे उभार
न्याहाळतो.'
प्रिया काँलेजात असतांना वर्गात रुक्ष गणितांच्या सरांकडे लक्ष कसं असणारं? मग…
'भिंगातून पाहे
सर तो खडूस
फेके तो 'खडू'स
माझ्याकडे.'
या 'खडूस' वर "अगं माय माय माय असा हेल काढके दाद देणेकुं दिल करत्या."
'प्रियेचा भक्त विव्हळ, आर्त वगैरे असणंही स्वाभाविकच. आणि केवळ स्वप्नातचं भेटं देणा-या प्रियेला तो निक्षून म्हणतो…
'संपणार कधी
स्वप्नांचा हा खेळ
काढ आता वेळ
सत्यातही'.
आणि एव्हढं करुनही जर तिने घेतलीच शंका तर हा 'जिगरबाज' कवी म्हणतो
'घेतलीत शंका
दाखविल 'तिस'
फाडून छातीस
आज येथे.'
ईसको बोलते जिगरा.!!
एखादा कवि असेल तो फार फार तर काय करेल त्याच्या प्रियेवर कविता करेलं.. पण हा कवि "मोठ्या उमद्या मनाचा अन् उदात्त विचारांचा धनी "कारण प्रियेच्या अख्ख्या कुटूंबावरच त्याने अभंग रचलेतं..
त्यांच्या प्रियेचा बाप….
'अंगी तो धिप्पाड
झोकात चालतो
नाकात बोलतो
काही बाही.'
तिचा भाऊ तर याहुन नगं……
'प्रियेचा तो बंधू
गुत्त्यावर दिस्तो
झिंगलेला अस्तो
रात्रं दिनी.'
तिची आई म्हणजे सौंर्द्याची खाणं आहे पण बहिण म्हणजे...
'वाढलेला घेर
कर्दमाचा गोळा
रुपावर बोळा
फिरविला.'
नाकावरची माशीही न उठणा-या खतरुड माणसांनाही ह्या ओळी हसवू शकतात अस मी येथे "प्रतिज्ञापुर्वक" नमूद करु ईच्छितो.
नंतर प्रियेचे (पटणं) भेटणं. आणि मग तिच्यासवे गुडूप तिमिरात ते "चलचिञ" (जे सहसा कुणीच बघतं नाहीत आणि जे अश्यावेळी फक्त चित्रपट बघतात त्याचं फार दिवसं टिकतं नाही असा सर्व्हे झाला होता म्हणे बा.)
'थेटरात जेव्हा
अंधार हा दाटे
प्रिया मग भेटे
बिलगुनी."
लैच गुदगुल्या करतात ह्या ओळी. पण प्रियेचा नखरा चितारतांना कवि लिहुन जातो..
'पाहून टाळणे
टाळून भाळणे
सर्वांग जाळणे
सावजाचे..'
ढोबळ मानाने चार विभागात हा संग्रह आहे.
1. पुर्वार्ध.
लाईन मारण्याचा टाईम पिरेड.
2.उत्तरार्ध
ती पटल्यानंतरचा पिरेडं.
3. प्रिया भक्तिसारं.
नवभक्तासाठी हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण ह्यात प्रियेला पटविण्याचे विविध गुरुमंत्र दिलेले आहेतं.
4. प्रियेचे श्लोक.
भुजंगप्रयातातल्या या अविट गोडिच्या अभंगाना खरचं तोड नाही.
पुस्तकं जेव्हढं हलक फुलकं आहे तेव्हढंच दर्जेदार झालयं. एकिकडे, आर्तता ,उत्कटता आणि विरहातली विव्हळता आहे तर दुसरी कडे 'ठो ठो' हास्यतुषार आहेतं. पण सगळा परिणाम केवळ AWESOME.. शिवाय सगळकाही छंदात त्यामुळे नाद, आणि लय आपसुक जपल्या जातेचं. एकदंरीत हे प्रियाबंबाळ पुस्तक वाचकाला "कुछ हटके वाच्या रे"चं निर्भेळ समाधान नक्किच देतं. रमेशदांच्या प्रयोगशिलतेला दंडवतं. आणि या आगळ्यावेगळ्या कलाकृतीबद्दल लक्षलक्ष धन्यवादं. शेवटी 'महारज' साहेबांची "माफी मांग" के त्यांच्याच स्टायलीत त्यांना ही मानवंदना.

खुप झाले येथे
संत आणि कवी
प्रियेवर ओवी
कोणी केली?
उघडा पुस्तक
प्रियेचे अभंग
वाचुनिया दंग
व्हाल तुम्ही.
एकदा वाचावी
'रमेशाची' प्रिया
व्हावे हसुनिया
लोटपोटं.
म्हाराज म्हणती
आदराने सारे
मर्म याचे खरे
उमगले.
प्रियेचे अभंग
रमेश ठोंबरे
माणूस बाप रे!!
अफाटचं.
महेंद्र गौतमं.
९४०५७०६६१२.
कवी- रमेश ठोंबरे
काव्यसंग्रह- प्रियेचे अभंग
प्रकाशक - विजय प्रकाशन नागपूर.
मूल्य-८० रुपये.

परतून ये...

अधांतरी आयुष्य हे
परतून ये परतून ये.

उद्विग्नता विष्षनता
या काळजाची ही व्यथा
समजून घे समजून घे.
परतून ये परतून ये.

अधुरेच ते का राहिले
जे स्वप्न तुजसवे पाहिले
अपूर्ण आहे तुजविना
पूर्णत्व दे पूर्णत्व दे
परतून ये परतून ये.

गेलीस जेव्हा सोडूनी
मैफिल सुनी मैफिल सुनी
तू ताल दे अन सूर दे
या मैफिलीला नूर दे
परतून ये परतून ये.

आरंभ मी अन अंत तू
हृदयात या जिवंत तू
जिवंतता मज दे सये
परतून ये परतून ये.
महेंद्र गौतम.
9405706612

मध्यरात्रीची कविता..

असे घणावर घण
काय कोणाच भंगल
धरतीच्या शिरावर
कोणी आभाळ टांगलं ?
अस खुडू नये कोणी
बाई लाजाळूच पान
तिच्या नाजूक देहाची
कशी नाजूक ठेवण
तिचं न्हातधुत अंग
अंग अक्रसनारा पैसा
मत्त वासनेच्या पोटी
जन्म ममत्वाचा कैसा?
त्याला येताना बघून
तिही घरास आवरे
तिच्या कुंतलाचा भार
त्याच्या काळजास चरे
दैवा पाठीवरचीहि
तोंड नागीण मिटू दे
घनघोर काळोखात
आता पापणी मिटू दे.
महेंद्र गौतम.

द्रोहपर्व.

नक्षलवादी….
वस्तीवस्तीतून पाड्यापाड्यातून
शोषितांच्या असहाय चिरकाळ्या घुमताना.
नपुंसक पोलिस अन वांझोट सरकार
न्याय देण्या कमी पडतस दिसतांना.
त्याच्या डोळ्यात आसवांसोबत राग दाटून येण साहजिकच.
मायसारखी जपलेली शेतच्या शेत
लाटणारे गब्बर भडवे बघून
त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाणही साहजिकच.
कुठंही सहज मिळणारी बंदूक
आता त्यान घेतलीच तर… बोंबलू नका.
तुम्हीच जन्माला घालताय
रोज एक नवा नक्षलवादी…!!!!
(द्रोहपर्व)
महेंद्र गौतम.

क्रांतीगीत….!!!!

आली कशी ग्लानी
आज विचारणा कोणी.
आत्मघाती निद्रेतुनी जाग येऊ दे.
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.

रक्त शूरवीरांच आहे तुझ्या अंगात
पेटूनी उठ गड्या ये पुन्हा रंगात
बंडाचा यांना पुन्हा भाग होऊ दे
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.

घोंगावते जे तुझ्या वादळ उरात
निषेधाच गाण गाऊ आज सारे सुरात
डोळ्यातही दाटुनिया राग येऊ दे.
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.

रुकू नको ; झुकू नको
घेतला वसा टाकू नको
अरे हक्क आहे तुझा वेड्या
भिक कुणा मागू नको.
क्रांतीने लाल हा भूभाग होऊ दे
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.!!!
महेंद्र गौतम.

सये असं छळू नये…!


सये असं छळू नये
सये असं जाळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

तुला छळायाची घाई
मला जळायाची घाई
नदीलाही सागराला
कशी मिळायची घाई
उभा सागरात तरी
प्याया पाणी मिळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

सये जाता जाता असं
नको फिरून गं बघू
कसं मनाला या सांगू
वेड्या राती नको जागू
असं पुढ गेल्यावर
पुन्हा मागे वळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

तुझ्या आठवाचा गंध
जसा प्राजक्त सांडला
काल म्हणे तुझ्यासवे
माझा मोगरा भांडला
तुही सय एकट्यात
माझी कुरवाळू नये.
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?
महेंद्र गौतम.

दरवळं...

आज ब-याच दिवसानंतर फुलांनी लदबदलेली जाई बघीतली, नभात कृष्णनिळ्या मेघांची ही वर्दळ,
ढगाळ कुंद,वातावरण ,रात्रीच्या सरींच्या ओल्या खुणा.मायला उगच हळवं व्हायला झालं.
फार वर्षाअगोदर घरच्या परसात हजारमोगरा होता तोही असाच बेभान फुलायचा आणि मला येता जाता उगच
रोमँटीक करुन टाकायचा. अशीच एक बाजुच्या घरची रातराणी. अवघी रात्र स्वतःच्या सुगंधान भारुन टाकणारी.
रात्री उशीरवर वाचत बसल्यावर थकवा आला की बाहेर जाऊन उरभर सुगंध घ्यायचो. तेव्हढ्या रात्री विनाकारणच
कुणाचीतरी आठवण यायची.गावच्या मठात चारदोन चाफ्याची भलीमोठी झाडं आहेतं.
लहानपणी तळ्यावर पोहायला गेल म्हणजे हमखास फुल वेचायचो, एकदा एकजण येऊन म्हणाला झाडाहुन खुपसारी फुलं काढुन
द्या एक रुपया देतो, लगेच सगळे सरसर झाडावर. त्यान ती फुल नव्याको-या साडीच्या मध्ये पसरवली आणि एक
रुपया देऊन, शिळ घालत तो निघुनही गेला.जिला ती साडी मिळाली असेल ती बिचारी आनंदान वेडावलीच असणार.
शाळेत असताना गणतंत्र दिन म्हणजे सण असल्यासारखाच साजरा करायचो, त्याच्या आदल्या दिवशीच ती म्हणाली
एखाद पूर्ण न उमललेलं लालजर्द गुलाबाच फुल देशील का आणून सकाळी? दहावीला होतो तेंव्हा, पूर्ण गाव पालथं घातलं
शेवटी गावालगतच्या एका मळ्यातून तिला हवं तस फुल मिळवलं. रात्रीतून सुकू नये म्हणून त्याभोवती ओलं फडक गुंडाळलेलं
आणि रात्री मध्येच उठून चारदोनवेळा त्यावर पाणी शिंपडलेल लख्ख आठवत. सकाळी तिला देताना उगीचच शहारलेलो.
तिनेही मग चार मोग-याची फुलं अल्लद हातावर टेकवली होती. काही वर्षांअगोदर लग्न होऊन ती सौदीला निघून गेली.
मध्ये एकदा अशीच रस्त्यात भेटली होती फार वर्षांनी, ते फुल अजूनही जपून ठेवल्याचं सांगत होती.
एखादं दुर गेलेलं जिवाभावाचं माणुस अत्तराच्या रिकाम्या शिशीसारखचं खरतरं, दुर जाऊनही त्याच्या आठवणींचा दरवळ मागे
राहिलेला.. मग मोगरा दिसला की त्याची आठवण ठरलेलीचं...
कुणाच्यातरी फार सुंदर ओळी आहेत..
प्रेम करावे जगण्यावर
प्रेम करावे मरण्यावर
प्रेम करावे फुलता फुलता
सुगंध उधळुन देण्यावरं..
महेंद्र कांबळे.

पावसाची चारोळी

धरतीच्या वेदना
आभाळाला कळतात….
त्याचे अश्रू मग
पाऊस होऊन गळतात…
महेंद्र गौतम.

कथा :- भूमिका


नेहमीपेक्षा आज तिला जरा उशिरच झाला होता. रिक्षान लगबगीन ती स्टेशनकडे
निघाली होती.
'भैया जल्दी चलो ८.१० कि लोकल पकडनी है!' घडीकडे पाहत ती रिक्षावाल्याला
सांगत होती.
मुंबापुरीच्या असंख्य चाकरमान्यासारखीच तिही एक.कुठल्याश्या प्रायव्हेट
फर्ममध्ये घर सांभाळून काम करणारी. लोकलच्या प्रचंड गर्दीत रोज प्रवास करणारी,
कामावरून थकून भागून आल्यावरही नवरोबाला गरम गरम वाढणारी.
खरतर ह्या घाईगार्दीच्या आयुष्याशी तीनं चांगलीच हातमिळवणी केली
होती.परिस्थितीशी जुळवून घेण्यात इतर मुंबईकरांसारखीच तीही पटाईत झाली होती.
लगबगीन ती स्टेशनमध्ये घुसली. लोकलने किंचित वेग घेतला होता. अगदी
डोळ्यासमोरून दिसणारी लोकल पकडण्यासाठी ती धावली.!! त्याच नादात पायाखाली
केळीची साल येउन तिचा कपाळमोक्ष होणार इतक्यात मागून तिला कुणीतरी सावरल.
'हट गेली लोकल!!' ती चिडून उद्गारली
तिला सावरणाऱ्याला धन्यवाद म्हणायचं भान तिला आल. ती वळली आणि एकदम चमकलीच..
मगची आकृती तिच्याकडे बघत मंद हसत होती.
"अविनाश तू..!!!!" आश्चर्याने ती जवळ जवळ ओरडलीच.
हो मिच... ती कमालीची गोंधळली
>> "तू इथे असा अचानक कसा .....????" तिला काय बोलाव तेच कळेना..
>> "सांगतो. सगळ सांगतो. चल कुठेतरी चहा घेऊ. तीन वर्षानंतर भेतेयेस, असच
>> तोंडदेखल बोलून बोळवण करणार का..??"
>> त्याच्या ह्या बोलण्याने ती परत गोंधळली. क्षणात तिला तिच्या जॉबचा विचार
>> आला. आधीच उशीर झालेला पण त्याच्याशी बोलनही खूप महत्वाचं होतं..
>> "एवढा काय विचार करतेस? अरे हो तुला कामावर जायच असेल..ठीक आहे पुढची गाडी
>> येइलच मग जा तू. तसाही मी आज रात्री जाणारच आहे म्हटलं दिवसभरात जरा जीवाची
>> मुंबई करावी.".
>> आपला भूतकाळ पुढ्यात आलेला पाहून ती तशीच फार चक्रावून गेली होती. तिच्या
>> मनात संमिश्र भावनांची गर्दी झाली होती आणि तसही खूप दिवसानंतर मन मोकळ
>> करायला कुणीतरी आपल माणूस भेटलं होत. हि संधी तिला घालवायची नव्हती. तसा तिचा
>> संसार फार नेटका होता, पण संवाद क्वचितच. लोकलचा प्रवास करून आंबलेल्या
>> शरीराने घरी येउन झाडझूड स्वयंपाक आणि इतर कामात रात्र कधी व्हायची तिला
>> कळायचच नाही. आणि सकाळी पाचला उठून स्वतःचा आणि नवर्याचा डब्बा करण्यात सकाळ
>> सरून जायची. तिचा नवरा आणि ती अशी दोघच राहायची, तो कायम उशिराच यायचा.
>> मनमोकळ्या गप्पा, दिलखुलास हसण, अश्या गोष्टी कुठेतरी बाजुला पडल्या होत्या.
>> सगळ कस यांत्रिक. तिचा नवरा रजत मुंबईत स्वतःच घर घेण्यासाठी राबत होता.
>> ऑफिसमधल्या फाईल्स घरी आणून तो काम करायचा. सतत कामाच्या
>> तंद्रीत.बँकबँलन्सच्या नादात त्यान स्वतःलाच वेठीस धरल होतं. या गोष्टीची तिला
>> विलक्षण चीड यायची. सुरवातीला तिने त्याला हे सांगितलं देखील. पण पैसा
>> जोडण्याचा आणि राबण्याचा हाच काळ आहे वय झाल्यावर कष्ट होणार नाहीत अस साचेबंद
>> उत्तर तिला मिळायचं.
>> "जाणार आहेस का मग? बघ लोकल येतेय.."
>> "एक मिनिट, चल बाहेर जाऊयात. इथे फार गोंगाट आहे रे." ती कसलासा विचार करत
>> बोलली.
>> एका छानश्या हॉटेलात बसून त्यांनी चहाची ऑर्डर दिली.तिने फोन करून कुणालातरी
>> काहीतरी सांगितलं.
>> "मग मुंबईत कसा?" वाफाळलेला चहा घेत तिची सुरुवात.
>> "अरे सांगायचच राहील, बहुतेक पाहिलं पुस्तक येईल माझ आकाराला एका
>> प्रकाशकाने बोलवलं होत."
>> व्वा ! लिहितोस म्हणायचं अजूनही? अभिनंदन!
>> "ते जाऊ दे ग. मला सांग तू कशी आहेस? संसार काय म्हणतो तुझा?"
>> "बर आहे सगळ." उगाच उसन अवसान आणल्यासारख झाल तिला.
>> "तू मात्र आहे तसाच आहेस. काहीच बदलला नाहीस."
>> "पण तू मात्र बदललीस. किती सुकलीस. फार दगदग होत असेल नाही.?"
>> ह्यावर फक्त ती खिन्नशी हसली. तिला एकदम सगळे आठवले तशी ती घाईत म्हणाली..
>> "सगळे कसे आहेत रे. आपला पूर्ण ग्रुप.? काय करतात कोणकोण? किती जणांची लग्न
>> झालीत ?"
>> "मुलींचं माहित नाही पण वश्या आणि सुध्या लग्न करून मोकळे झालेत दोघेही एका
>> बँकेत लागलेत पैसे भरून.."
>> "आणि आपण काय करता? लिखाणच करता कि अजून कुठे नोकरी वगैरे?"
>> " हो प्राध्यापक आहे एका कॉलेजात. शिवाय phd. करतोय. तुमच्या b.com.
>> वाल्यासारख थोडीच आम्हाला डिग्री झाल्या झाल्या जॉब मिळतो.
>> स्ट्रगल आहे कला शाखेत फार. पण लिहिता वाचता येत."
>> "आणि लग्न वगैरे?"
>> ह्या प्रश्नासरशी त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला..
>> "नाही अजून ! ते जाऊ दे काय दाखवशील तुझ्या मुंबईतल.? बघण्यासारख भरपूर आहे
>> म्हणे इथे? मला तर समुद्रच बघायचाय."
>> "चालेल. जाऊयात चल."
>> "एवढ्या चिक्कार गर्दीत कस adjust करता रे तुम्ही..??" स्टेशन वरची गर्दी
>> त्याला असह्य झाली होती.
>> "होते रे सवय हळूहळू."
>> "सवय होते कि करून घेता?"
>> 'तसच काहीसं..."
>> इतक्यात लोकल आली. सरावान ती आत घुसली. मागोमाग तोही चढला. बाहेरची
>> स्टेशन्स, चढणारी, उतरणारी माणस , सगळ वातावरण त्याला नवखच होत.
>> पण त्याच्या शांत हसर्या चेहऱ्याकडे बघत तिच्या मनात मात्र विचारांचं वादळ
>> उठत होत. किती मोरपंखी दिवस होते ते. एकमेकांच्या प्रेमात तुडूंब डूबण्याचे !!
>> फुलपाखरू होऊन बागडण्याचे. अविनाश तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तिचही होतच
>> त्याच्यावर प्रेम. प्रेमाचा कैफच वेगळा. त्या धुंदीतच भरभर तीन वर्ष सरून
>> गेली.डिग्री संपली.त्याच वर्षी रजत तिला बघायला आला. घरच्यांना थोडी कुणकुण
>> होतीच,एखादा वेडसर निर्णय घेऊन पोरगी आयुष्य उध्वस्त करून घेईल ह्या भीतीपोटी
>> घरच्यांनी तिची गाठ रजतशी बांधून दिली. बिचारीचा विरोध वळीवाचा पाऊस ठरला.
>> मुकाट बाशिंग बांधून तिला रजतच्या घरी जावच लागल.अविनाशला विसरण आणि रजतला
>> स्विकारण दोन्ही गोष्टी सोप्या नव्हत्या. गेली तीन वर्ष ती घुसमटत पण टुकीन
>> संसार करत होती. एव्हाना cst आल. दोघंही उतरून समुद्राकडे चालू लागली. हळूहळू
>> समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर येऊ लागला.
>> "तू अजूनही तेव्हादाच भटकतोस.?"
>> "मग काय छान वाटत मला तेच. पण तू ऑफिसला दांडी मारलीस ना ते बघून मला जुने
>> दिवसच आठवलेत एकदम. कॉलेज बुडवून कसे भटकायला जायचो ना आपण.?"
>> मग बराच वेळ ते दोघ वाळूतून चालत राहिले. भेल पाणीपुरी बर्फ का गोला.. किती
>> दिवसानंतर ती एवढ खळाळून हसत होती, ती कोण आहे हे काहीवेळ तरी ती विसरलीच.
>> बराच वेळ ते इकडे तिकडे भटकत राहिले. आणि संध्याकाळी परत किनार्यावर आले.
>> किनाऱ्यावरच्या लाटांकडे पाहत दोघांचीही तंद्री लागली.
>> "खर सांग तू लग्न का नाही केलस अजून.? तिने त्याच्याकडे बघितलं. तसा तो
>> भानावर आला.
>> "असच नाही केल. म्हणजे करावस वाटल नाही आतापर्यंत म्हणून."
>> "करावस वाटल नाही कि मी तुला सोडून गेले म्हणून.?"
>> "काहीतरीच नको बोलूस.. तस नाही काही."
>> "कदाचित असेलही; पण खर सांग ब्लडप्रेशर असणाऱ्या वडिलांना दुखवण माझ्याकडून
>> कस शक्य होत रे..? त्याचं काही बर वाईट झाल असत तर? अवघड होत सगळच. किती
>> दिवसापासून हा सल मनात घेऊन जगतेय. कस जगतेय ते माझ मलाच ठाऊक. पण अपराध केलाय
>> तुझा मी. जमल्यास माफ करशील मला." तिचे डोळे सजल झाले.
>> "खर सांगायचं तर माझी होरपळ तुला सांगूही शकत नाही. एखाद्या अनोळखी माणसाला
>> सर्वस्व अर्पण करण्यात किती जीव गुदमरतो ते कळायला बाईचाच जन्म लागतो..
>> त्याच्या मिठीत असताना मला तुझ्या मिठीत असल्याचा भास व्हायचा. किती सुंदर
>> इमले बांधले होते मी उद्याचे. तुझ्यासोबतच्या सहजीवनाचे. पण......
>> घरच्यांशी मनमोकळ बोलावही नाही वाटत तेंव्हापासून. प्रचंड तिटकारा येतो.
>> घरातही रजतचा शब्द अन त्याचीच मर्जी.. एका सुशिक्षित मुलीला स्वतःचा
>> आयुष्यभराचा सोबती निवडण्याचाहि अधिकार नसावा..?"
>> तिला त्याच्या कुशीत शिरून हमसावस वाटल. त्यान प्रेमान तिच्या हातावर हात
>> ठेवला.त्याच्या डोळ्यात प्रचंड कारुण्य दाटल होत.
>> "हे खरय कि तूझा खूप राग आला होता मला. तिरस्कारही वाटायचा तुझा. आणि तो
>> साहजिकही होता. अगतिकता येतेच कि त्यावेळी. पण काळ जाऊ द्यावा लागतो थोडा.
>> मला वाटल कि मी संपलो पण खर सांगतो मोठ चिवट असत आयुष्य. मोठ्या मोठ्या जखम
>> भरतात सहजच. दुःखाच,वियोगाच,वेदनेच विस्मरण स्वाभाविकपणे होतच. तुझी आठवण आली
>> कि चडफडायचो. पण शांत डोक्यान विचार केल्यावर उमगल एक दिवस,
>> भूमिका महत्वाची. प्रत्येकजण आजन्म त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा
>> प्रयत्न करतो. वेगवेगळ्या जागी वेगवेगळी भूमिका.त्या भूमिकेशी प्रतारणा
>> कुणालाही करता येत नाही. तुझ्या वडिलांच्या भूमिकेत मी असतो तर माझाही तोच
>> निर्णय असता. त्याचं सगळच योग्य होत. एक बाप आपल्या मुलीचा हात एखाद्या
>> बेरोजगार माणसाच्या हातात देइलच कसा.? लायकी, कर्तुत्व ह्या गोष्टी बापासाठी
>> महत्वाच्या असतात..प्रेमात आणि संसारात भयंकर तफावत आहे. तुझ्यावर काहीच रोष
>> नाही माझा. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त तुला भोगाव लागल याची जाण आहे मला. तू
>> गेलीस आणि पुस्तकावरच प्रेम करायला लागलो. M.A. केल B.ed करून कॉलेज मध्ये
>> लागलो. आपण कधीतरी सर्वस्व विसरून प्रेम केल होत हि भावनाच खूप सुखावून जाते
>> कधी कधी.
>> तू रजतमध्ये कधीच मला शोधत जाऊ नकोस कारण प्रियकर आणि नवरा यांची कधीच तुलना
>> होत नाही. नवर्याच्या भूमिकेत जबाबदार्या असतात. प्रियकराला फक्त प्रेम करायचं
>> असत.. रजत त्याच्या भूमिकेला साजेसाच वागतोय.. तुझ्यासाठी तुमच्या सुखावह
>> उद्यासाठी तो कष्ट उपसतोय तुला त्याला साथ द्यावीच लागेल. बायको,मुलगी, सून,
>> या सगळ्या भूमिका तुलाही पार पाडायच्यात.. तुला पाडगावकरांची ती कविता आठवते
>> का?
>> "पेला अर्धा सरला आहे
>> अस सुद्धा म्हणता येत
>> पेला अर्धा भरला आहे
>> अस सुद्धा म्हणता येत
>> सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं
>> तुम्हीच ठरवा
>> सांगा कस जगायचं कण्हत कण्हत
>> कि गाण म्हणत तुम्हीच ठरवा.."
>> म्हणून म्हणतो अस मुळूमुळू नको रडत बसू. जे आहे ते स्वीकार शेवटी वास्तव हे
>> वास्तवच असत.आणि भूतकाळाच्या आठवणीत कुढत जगण्यापेक्षा वर्तमानाचा विचार कर.
>> तो जास्तीत जास्त आनंदी करायचा विचार कर.
>> "बर गातेस कि नाही कधी ?"
>> त्याच्या या प्रश्नावर मात्र ती खुदकन हसली..
>> "हल्ली तर बाथरूममधेसुध गात नाही रे. मोठ्या हौसेन तंबोरा आणला होता. धूळ
>> खात पडलाय कधीचा"
>> "मग त्यावरची धूळ झटक आणि तुझ्या मनावरचीदेखील.. चल निघुयात.. " तो
>> जाग्यावरून उठत म्हणाला. आणि ती दोघं परत स्टेशन कडे चालू लागली.
>> तिच्या गाडीला थोडा वेळ होता. गाडीची वाट पाहत ती दोघे उभी होती.
>> "एक बोलू का ? तू आलीस एक दिवस सोबत घालवलास खूप बर वाटल. माझ्या लग्नाची
>> पत्रिका तुला लवकरच पाठवीन. "
>> तीन हलकेच त्याचा हात हातात घेतला इतक्यात गाडी आली.. आणि ती डब्ब्यात
>> चढली. त्याने तिला निरोप दिला..
>> आता तिला त्या
>> डब्ब्यातल्या बायकांच्या आवाजाचा त्रास होत नव्हता. गर्दी विसरून ती स्वतःत
>> गुंगून गेली खूप दिवस ठसठसनारा फोड फुटून त्यातून सगळी घाण निघून जाउन
>> प्रचंड सुखावह वाटावं तस तिला वाटू लागल. बर्याचशा गोष्टी तिने ठरवून टाकल्या.
>> घरी जाताना छानसा गजर घ्यायचा, रजतच्या आवडीचे मसाला वांगे करायचे, वडिलांना
>> फोन करून त्यांच्या तब्बेतीची चौकशी करायची.. आणि तंबोरा साफसूफ करून परत
>> गायला बसायचं होत.
>> पळणारे झाड आणि माणस बघत ती स्टेशनची वाट बघत स्वस्थ बसली..
>> महेंद्र गौतम.

गझल.2

काही नवे शेर आणि काही चुकांची दुरुस्ती करुन परत पोस्ट करतोयं.

तुझे गोड कावे तुझे फोल दावे
अता जाणले मी तुझे बारकावे.
कशाला जगाची तमा बाळगावी
कशाला जगाशी अता मी लढावे.
मला साथ आहे इथे वादळांची
खुळ्या संकटांनी जरा दूर व्हावे.
तुझ्या त्या तिळाची किती गं मुजोरी
तुझ्या काजळाने किती गं छळावे.
नवा सूर आहे नवा ताल आहे
नवा कंठ आता नवे गीत गावे.
करा पिंज-याची कवाडे निकामी
नभी पाखरांच्या उडावेत रावे.
नको घेउ हाती जगाचा तराजू
तुझ्या काळजीने मला पारखावे.
असा संपलो मी असे वाटतांना
तुझ्या वेदनांनी फुलारून यावे.
किती तू गहीरा दिला घाव होता
किती सावरावे कसे सावरावे.?
अकस्मात जेंव्हा समोरून आली
कळेना मनाला कसे आवरावे.
नवा आरसा की नवा चेहरा हा
नव्याने कसे मी हसूनी जगावे.
नशीबात आहे अशी ही फकीरी
सुखाचे मला तू अता दान दयावे.
महेंद्र गौतम.

गझल.

तुझे गोड कावे तुझे फोल दावे
अता जाणले मी तुझे बारकावे.

कशाला जगाची तमा बाळगावी
कशाला जगाशी अता मी लढावे.

मला साथ आहे इथे वादळांची
खुळ्या संकटांनी जरा दूर व्हावे.

उन्मळून गेलो तिने दूर जाता
तिच्या आठवांनी कशालाच यावे.?

नको घेउ हाती जगाचा तराजू
जरा काळजीने मला तू बघावे.

असा संपलो मी असे वाटतांना
तुझ्या वेदनांनी फुलारून यावे.

किती तू गहिरा दिला घाव होता
किती सावरावे कसे सावरावे.?

(अकस्मात जेंव्हा समोरून आली)
कळेना मला मी कसे आवरावे.

नवा आरसा कि नवा चेहरा हा
नव्याने कसे मी हसूनी जगावे.

नशिबात आहे अशी हि फकीरी
सुखाचे मला तू अता दान दयावे.
महेंद्र गौतम.

घाव.

मोहरल्या आनंदाचे
मनडोही तरंग बाई
या अश्या अनामिक वेळा
हि कशी अनामिक घाई?
एक श्वास कसा थरथरला
निशब्द पापणी ओली
मी उगच मोजाया बघतो
गूढ आभाळाची खोली
ओठास कसा मी आवरू?
स्तन तिचे रक्ताळून गेले
ती पान्हा आटली डोंबारीन
अन मुल तिचे रडवेले.
महेंद्र गौतम.

मी.

जगाने टाळलेला मी
तमाने जाळलेला मी.
वसंता दूर तू जा रे
मुळाशी वाळलेला मी.
कुणाची वाट ती पाही
तिनेही गाळलेला मी .
जरासा पापणी चाळा
कसा ओशाळलेला मी.
सईची याद येतांना
उभा गंधाळलेला मी.
कुणाला शोधतो आहे
कुणी धुंडाळलेला मी.
तिथे तू घाव भर त्याचा
इथे रक्ताळलेला मी.
जळूनी खाक झालेला
तरी तेजाळलेला मी.
महेंद्र गौतम.

मी.


जगाने टाळलेला मी
तमाने जाळलेला मी.

कशाचा चांदवा आता
रूपाने पोळलेला मी.

वसंता दूर तू जा रे
मुळाशी वाळलेला मी.

कुणाची वाट ती पाही
तिनेही गाळलेला मी.

सईची याद ती येता
उभा गंधाळलेला मी.

कुणाला शोधतो आहे
कुणी धुंडाळलेला मी.

धावण्या वेग तो येता
जरा रेंगाळलेला मी.

जळूनी खाक झालो रे
अता तेजाळेला मी.
महेंद्र गौतम.

पुस्तक -'आहे काँर्पोरेट तरी'

अस्सलं कलाकृती काय असते? मला वाटतं जिचा आस्वाद घेण्याचा वारंवार मोह व्हावा आणि दरवेळी त्या कलाकृतीनं पहिल्याईतकाच उत्कट आनंद तुम्हाला द्यावा, मग ते एखाद धुंद गाणं, सिनेमा असो किंवा पुस्तक असो.
घरचं पुस्तकाचं कपाट ब-याच दिवसानंतर निटं करत होतो आणि साधारण दोन वर्षाअगोदर घेतलेलं एक पुस्तक हाती लागलं. श्री. संजय जोशी' लिखीत, 'आहे काँर्पोरेट तरी'.
एका लोकविलक्षण अवलियाचं हे चकित करणार आत्मकथनं.
"झगमगत्या काँर्पोरेट विश्वात 'बिग बाँस' बनुन वावरल्यानंतर त्या मोहमयी दुनीयेकडे पाठ फिरवणा-याला कुणीही वेड्यात काढावं. पण महिन्याला लाखो रुपये पगार, मानमरातब आणि वाट्टेल तेव्हढे अधिकार हाती असुनही नोकरी सोडून देणारेही असतात. काँर्पोरेट दुनियेच्या मोहमयी जगात रमण्याऐवजी सर्जनशील जगण्याचा आनंद मिळवण्यासाठी 'हटके' पाऊल टाकणा-या एका 'बिग बाँस'ची ही गोष्ट."
पट्टीचा वाचणारा एकाच बैठकित हे पुस्तक संपवेल एव्हढं प्रवाही लिहिलं आहे. रटाळपणा कुठंच नाही त्यामुळं वाचतांना एकही जांभई येतं नाही. एक विलक्षण वेग, ऊर्जा आहे या पुस्तकातं, वाचणारा आपसुकच 'पेटतो',( प्रेरीत होतो).
मला सबंध पुस्तकभर 'ऑलकेमिस्ट'मधला स्वप्नांच्या मागे धावणारा सँतिऍगो आठवला पण ऑलकेमिस्ट ही 'परिकथा' आहे आणि हे पुस्तक 'खरीकथा' आहे.
'स्वप्ने अशी पाहिन ज्यांना गंध मातीचा मिळो
गंध जगण्याला मिळो माझ्याच त्या स्वप्नातला'.
डायरेक्ट जगण्याला भिडायची उर्मी देणा-या, सर्जनशिलतेचा वसा जप म्हणणा-या या पुस्तकाला आणि श्री. संजय जोशी यांना कुर्निसात, दिलसे सलामं.-^-
मर्म जगण्याचे उमजता मी अश्या शब्दांत गावे
शब्द व्हावे मंत्र ज्यांना अर्थ ये मौनातलां...
महेंद्र गौतम.

हेवा.

बुलेटप्रुफ कारमधून तुम्ही हिंडता
झेड सुरक्षेत डरकाळ्या फोडता
तुम्ही कुणालाही हवं तसं वागवता, वाकवता आणि नाचवता
जो तो येऊन तुमच्या समोर हात जोडतो
खरच मला तुमचा हेवा वाटतो
तुमच्या एका शब्दाने ईथे मारामा-या होतात
तुमच्या नुस्त्या बोलण्याने माणस पेटतात.
तुम्ही घडवू शकता
मोर्चे आणि दंगली सुध्दा
तुम्हाला घाबरतात माणसे
वाईट आणि चांगलीसुध्दा
तुमच्यातलाच कुणीतरी मग
प्रती मंत्रालयच चालवतो
खरचं मला तुमचा हेवा वाटतो.
निवडणुकीसाठी तुम्ही करोडो खर्चता
निवडून आल्यावर वसुलही करता
तुमच्या नुस्त्या चिठ्ठीने
ईथे सगळी कामे होतात
नामांकित लोकही तुमचे पाय चाटतात
तुम्हाला अपचन कस होत नाही हा विचार मी करतो
खरच मला तुमचा हेवा वाटतो
प्रतीपक्षावर तुम्हि चिखलफेक करता
चक्क त्या पक्षात जाऊन
त्याचेच गोडवे गाता
रंग बदलण्याच्या बाबतीत
सरडासुध्दा तुम्हाला लाजतो
खरच मला तुमचा हेवा वाटतो
तुमच्या आशीर्वादाने ईथे
गुत्ते, अड्डे चालतात
राँकेल, वाळुमाफीया लोकांना लुटतात
भरधाव अँपेवाले लोकांना चिरडतात
सगळ्यांच्या पाठीवर तुमचा हात असतो
खरच राव, मला तुमचा हेवा वाटतो.
सगळ्या रंगाना तुम्ही बापाची जागीर समजता
सर्रास महापुरषांना दावणीला बांधता
मतासाठी माणसांना धर्म जातीत विभागता
तरी मी तुम्हालाच मत देतो
खरंच मला तुमचा हेवा वाटतो..
महेंद्र गौतमं.
(अर्घ्यदानं)

साथ...

या देशात अनेक साथी आल्यात आजवर.
देवी, पटकि, महाभयंकर प्लेग ते अगदी,
आता आताच्या बर्डफ्लू, चिकन गुनिया पर्यंत.
पण आता एक नवीच साथ पसरलीय इथे.
बलात्कार - खुनाची.!!!!
------------------------------------
सरकार आता शंडत्वाची लस शोधणारेय म्हणे.
महेंद्र गौतम.

बिढारं:- एक अस्सल नेमाडपंथी अनुभवं..

एखाद्या आवडत्या गावाला जायचं असल्यावर लहान मुल किती हरखुन जातं. त्यात मग ट्रेनची विन्डो मिळाल्यावर क्या बातं!!. मग ट्रेन शिट्टी देते, हळूहळू वेग घेतो. मग झाडं ,माणसं पळतांना बघणं. चॅय्यवाला भेळं... किती रंगून जातं ते मुलं. माझंही अगदी तसचं झालं निमीत्त भालचंद्र नेमाडेंच 'बिढार'..
मी नेमाडेंच्या लिखाणाचा ,शैलीचा आणि त्यांच्या मिशांचाही जबरदस्त फॅन आहे. ऑल टाईम ग्रेट कोसला आणि बहुचर्चीत हिन्दू यांचा हँगओव्हर अद्याप उतरलाच नाही. त्यामुळे बिढार सुरु केलं तेचं रोमांचीत अवस्थेतं आणि मग हळूहळू वेग घेतं अपरिहार्य रंगून जाणं..
कादंबरीची सुरुवात चांगदेवं या कादंबरीच्या नायकाच्या दुर्धर आजारपणापासून होते पण त्याला काय झालं हे कळायलाचं 86व पानं यावं लागतं तोपर्यंत उत्कंठा ताणुन राहते.
कादंबरी एकदम सळसळती आहे, चांगदेव आणि त्याचे भयंकर क्रिएटीव्ह मित्रं. जग बदलु पाहणारं अमाप ऊर्जेचं तारुण्यं.. आजारपणामुळे निराश होऊन भयंकर वैराग्य येऊन स्वतः स्वतःलाच अंताकडं नेणारा आणि अकस्मात त्या आजारातून आश्चर्यकारकरित्या वाचल्यावरं पुढचं आयुष्य सकारत्मकतेनं जगायचं ठरवणारा चांगदेवं वाचकाला बांधुन ठेवतो. आजारपणातलं त्याच भावविश्व अप्रतिमं रेखाटलय पणं यात सौँर्द्यपुर्ण पध्दतीन काही सामाजीकं प्रश्नही हाताळलेतं जसं 'प्रकाशकाची ऐतखाऊ संस्था'.. दुसरीकडं लिहिणारे बेसुमार वाढलेतं ज्याला त्याला प्रसिध्दिची घाई झालीय मग पैसे घेउन छापणारं नाहित काय? हा सवालंही येतो.
पण जादु आहे नेमाडेंची शैली म्हणजे, कोसलात जसं उदाहरणार्थ, थोर, हे मात्र फारचं झाले असे शब्द येतातं तसचं रामराव नावाच्या कॅरॅक्टला धरुन ईथं 'सहेतूक' हा शब्द येतो त्यांच वागणं, बोलणं, हसणं ईव्हन दुर्लक्ष करणही सहेतूकचं..
सहेतूक आला कि गुदगुल्या ठरलेल्याचं.. करंटेपणाची पदकही आनंदान मिरवता यायला हवितं असलं अद्भुत तत्वज्ञान आहे या पुस्तकात बाकी
फक्त नेमाडेंच्या मुठीत आपलं बोटं द्यावं एक सुंदर सफर आपोआपचं घडते..
(एक सामान्य रसिकं)
महेंद्र गौतमं.

जन्माला यावं अन् एकदा प्रेम करावं..,

मनाच्या रित्या कोप-यात
नाव तिचं कोरावं
कामाच्या धबडग्यातही
जरा तिच्यासाठी झुरावं..
जन्माला यावं...
अन् एकदा प्रेम करावं...
मग चंद्र जवळचा वाटतो
ता-यांची ओढ लागते..
प्राजक्त भुरळ घालतो..
कविता रुचतात, कधी कधी सुचतातं...
तमाम सिनेमांची गाणी
आपली आपली वाटतातं..
डोळ्या-डोळ्यांनी बोलणंही..
मोठं गोड असतं...
सकाळ संध्याकाळ मनाला
तिचंच वेड असतं..
वाढदिवशी बाराला तिचा
फोन असतो घ्यायचा
मित्रांच्या शिव्या खात
नंतर केक असतो कापायचा...
रोज संध्याकाळी ती
गॅलरीत येते...
अशी रोज रोज मग...
ईद मुबारक होते...
एखादा चोरटा स्पर्शही
हवाहवासा असतो..
स्वस्त मोबाईल प्लॅन
कुणी शोधत बसतो..
पाऊस आला म्हणजे आपणं
शेवरीचा कापूस होऊन जातो..
मनातल्या मनात तिच्यासोबतं..
कितिदातरी भिजून घेतो..
पण एखाद स्वप्नं
पुर्ण होण्याअगोदर जाग येते....
अख्खा दिवस त्या स्वप्नापायी
मन कसं हुरहुरुन जाते...
तरी मनाच्या कोप-यात
तिचं नावं कोरावं...
कामाच्या धबडग्यातही
कधी तिच्यासाठी झुरावं...
जन्माला यावं......
अन्
एकदा प्रेम करावं...
महेंद्र..

'अर्घ्यदानं'ला मिळालेली ही दिलखल्लास दादं...

महेंद्र कांबळे लिखित 'अर्घ्यदान' (कविता संग्रह)
अक्षरलेणं प्रकाशन, सोलापूर
मूल्य रू. ६०/-

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. पण ढोबळ मानाने दोन प्रकारांत 'माणूस' ह्या प्राण्याचं वर्गीकरण करता येऊ शकेल. एक - सकारात्मक विचार करणारा आणि दुसरा - नकारात्मक विचार करणारा. कठीण, वाईट परिस्थितीत असताना, चिडून, निराश होऊनही सकारात्मक व्यक्ती त्या परिस्थितीतून काही तरी चांगलं शोधतेच आणि उभारी घेते व देतेच. कविता हेही माणसाच्याच मनाचं प्रतिबिंब. त्यामुळे हे ढोबळ वर्गीकरण कवितेचंही होऊ शकेल का ? केल्यास, महेंद्रची कविता ह्या सकारात्मक दृष्टीकोनाची कविता आहे, असं मी म्हणीन. त्याच्या 'अर्घ्यदान' ह्या कविता संग्रहातील कवितांतून तो आनंद, दु:ख, नैराश्य, संताप हे सारं काही मांडतो. गुलाबी प्रेम आणि धुमसणारा विद्रोहही दाखवतो. पण ही प्रत्येक छटा तो अगदी हलक्या हाताने रंगवतो. त्यात कुठेही आकांडतांडव दिसत नाही.

'अर्घ्यदान'ची सुरुवात होते, ती शीर्षक कवितेपासूनच. नैराश्याने ग्रासलेल्या भयाण अंधारात असतानाही कवी ह्या कवितेत असा विचार मांडतो आहे की ह्याही रात्रीची पहाट होणारच आहे. तो सूर्य नवीन असणार आहे आणि त्याचे स्वच्छ मनाने मला स्वागत केले पाहिजे. कालच्या दु:खामध्ये बुडून राहून मी उद्या येणाऱ्या अगणित क्षणांना येण्याआधीच कुजवणार नाही. इथेच आपल्याला जाणवते ती तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा आवेश दर्शवणारी शैली व हाताळणी. विद्रोहसुद्धा सकारात्मक असू शकतो. विद्रोहासाठी कविता काळोखी/ बरबटलेली/ कोरडी/ रापलेली व एकंदरीतच विद्रूप असावी लागत नाही.
स्फूर्तीदायी शब्दांत महेंद्र जेव्हा -

दीप घेऊन चाल गड्या
कर एकाचं तरी आयुष्य उजळ
जरी सूर्य नाही होता आलं
तरी निदान पणती होऊन जळ

असं म्हणतो तेव्हा आपल्याला, आपल्याच पाठीवर थाप देऊन एखादा मित्र प्रोत्साहित करतोय असं वाटतं. हाच मित्र जेव्हा अगदी त्याच्या मनातली गोष्ट सांगतो की -

वेदनेवर तिची फुंकर झेलताना
म्हणावं जिकीरीला 'शुक्रिया'
हॉटेलचं बिल ती देताना
म्हणावं फकीरीला 'शुक्रिया' !!

तेव्हा छानपैकी गुदगुल्या होऊन त्याच्यासोबत एक कटिंग चहाचा 'चिअर्स' केल्याचाही आनंद मिळतो !

ह्या छोट्याश्या पुस्तकात एकूण ४७ कविता आहेत. त्यातील मला जवळजवळ सगळ्याच अत्यंत आवडल्या. तरी, 'अर्घ्यदान, टोळधाड, प्रकाश गाणं, पाऊस गाणं, आयुष्य, रानपाखरांचा थवा, कातरवेळ, सई आठवण तुझी, शुक्रीया, फुफाटा, हुरहूर, मैत्रिणीस, ती, रंग' ह्या कविता मला फारच आवडल्या.
त्याच्या कवितांत सळसळतं तारुण्य जाणवतं. त्यात कुणाला उथळपणाही जाणवेल. पण, मला चैतन्य, खळखळाट जाणवला. तरुण वयातही सामाजिक भान असल्याचं अनेक जागी जाणवतंच.
प्रत्येक परिस्थितीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, आधी म्हटल्याप्रमाणे, बहुतकरून सकारात्मक असला तरी पु.लं.च्या विनोदासारखा हसवता हसवता हळूच एखादा खूण सोडणारा चिमटा घेण्याचा गुणधर्मही अनेक कवितांत आहे. 'फुफाटा' मध्ये एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा कॉलेजमधल्या मुला-मुलींना पाहून प्रेमाची स्वप्नं पाहायला लागतो आणि हलक्या फुलक्या शैलीत, ग्रामीण भाषेत, आपले विचार मांडताना कळतच नाही कविता कधी अत्यंत गंभीर वळण घेते आणि अखेरीस -

आठ एकर कोरडवाहू वायता वायता
जाईल माई बी जिनगानी सडून
शेतकऱ्याईच्या पोराईनं
काय करावं पिरमात पडून

- असं अंगावर येणारं भाष्य करते. अश्या अनेक कवितांतील अनेक ओळी म्हणूनच मनात घर करून राहातात. आपल्याला अपेक्षित नसताना एखादा चिमटा/ कोपरखळी/ चपराक बसते आणि मग तिथंपर्यंत लिहिलेल्या साध्या सुध्या शब्दांचेही संदर्भच बदलतात अन् डोळ्यात खुपतं एक बोचरं वास्तव.

माझं मन जणू मृग
चित्त धावं तिच्यामागं
काय धावून फायदा
तिचं रूप मृगजळ
मन झालं सैरभैर
कशी कातर ही वेळ ........................... (कातरवेळ)

सई आठवण तुझी
जणु वणवा गं रानी
पारव्याच्या ओठावर
आर्त विरहाची गाणी ........................... (सई आठवण तुझी)

विराण राज्याच्या मी कफल्लक राजा
फाटक्या फकीरीतही लुटायचो मजा ........................... (भूक)

अश्या अनेक ओळी सांगता येतील जिथे आपल्या तोंडून नकळतच 'व्वाह!' निघून जातं ! पण वैशिष्ट्य हे की हा परिणाम साधताना कवी कुठेही आक्रस्ताळेपणा करत नाही. तलत मेहमूदच्या गाण्यातील तरलतेने तो आपले दु:ख मांडतोआणि ते मांडत असताना आपल्याला दिसतो त्याचा - कवीचा - चेहरा.. मंद स्मित करणारा. त्या वेळी मनात एकच विचार येतो - This man is a smiling killer... very cruel !

बहुतेक कविता ह्या शेवटाकडे एक धक्का देणाऱ्या आहेत, वळण घेणाऱ्या आहेत. ह्या शेवटापूर्वी केलेली वातावरणनिर्मिती साध्या-सोप्या व संवादात्मक शैलीत आहे. त्यामुळे कवीला अपेक्षित पार्श्वभूमी लगेच तयार होते. कविता चित्ररुपाने दिसू लागते आणि मग शेवटी येणारा धक्का काही जागी काळजाचा ठाव घेतो, काही वेळी अंगावर काटा उभा करतो तर काही वेळी चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटवतो.प्रत्येक कविता एक संपूर्ण चक्र आहे. एक प्रवास पूर्ण करून आणि करवूनच कवी कविता संपवतो, तेव्हा खरोखरच कविता वाचल्याचं मनोमन समाधान मिळतं. जसं की -

माझ्यासाठी फुलांची पखरण करताना
निदान एक फूल तरी ठेवायचंस
स्वत:च्या केसांत माळण्यासाठी !! ........................... (मैत्रिणीस)

बळीराजा कृतकृत्य
होवो हिरवी ही धरा
भुकेजल्या पाखरांना
मिळो मोतियांचा चारा ........................... (पाऊस गाणं)

'अर्घ्यदान' ह्या पुस्तकात मुक्त छंद आणि काही अक्षरछंद असे दोनच काव्यप्रकार आहेत. कवी इथे जास्त प्रयोग करत नसला तरी विषय मात्र अनेकविध हाताळतो. खूप गूढ किंवा वजनदार तत्वज्ञान ही कविता सांगत नाही.... पण पुस्तक एकदा वाचायला घेतलं की लगेच खालीही ठेववत नाही. नक्कीच आपल्या संग्रही असावा असा हा एक छोटेखानी कवितासंग्रह आहे.

धन्यवाद महेंद्र ! आणि पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !

....रसप....

भाकरीच्या कविता..

चारी बाजुंनी अंधार हजारो हातं उगारत चाल करुन येतांना एखाद्या काजव्याचं क्षणीक लकाकणंही कुणालातरी प्रचंड धिर देऊन जातं. प्रकाशाची ती एक झलक झगडायची हिंम्मत दुपटीने वाढविते...

आपल्याकडे एक वर्ग असाही आहे ज्याच्यापुढे भाकर हा मुलभूत प्रश्न आहे. एकिकडे पानावर आणून हातावर खाणारा वर्ग तर दुसरीकडे सोन्याच्या ताटात चांदीच्या चमच्याने खाणारी माणसं.. ही तफावत सलणं सहाजिकचं.. अलोट दुःखात एखादाच सुखाचा आलेला क्षण उत्सव म्हणून साजरा करणारी सकारात्मक माणसं कशी झगडत असतील भाकरीसाठी?

जसं सुचेल तसं लिहायचा हा एक छोटासा प्रयत्नं..

"भाकरीच्या कविता.."

पोचल्यास दाद द्याचं पण त्याहीपेक्षा निर्मळ टिकेचं मनापासुन स्वागतं.

महेंद्र गौतम.

-----------------------------------------------------------------------------

1.

या येळलां...

मिरगं जोरदार पडल्यावर

किती मोहरलो..

बैलासंग बैलाईतकच राबलो..

सावकाराचे उपकारचं..

दिढीमाढीन का व्हयंना..

पेरणी तं साजरी केली..

आता हे डोलणारे

हिरवे हिरवे जवारीचे धांडे..

कसं हिरवंगार वाटतयं...

अडत्यांना जरा बुध्दी येऊ दे..

या साली जरा भाव मिळू दे..

कणगीत दाणे असेच खेळू दे..
महेंद्र गौतम
-----------------------------------------------------------------------------------

2.

या येळला...

इंटरव्हू तं जोरदार गेला..

सगळ्याच प्रश्नाची उत्तर ठाऊकं..

लोकायसारखा सिगरेटचा नादं..

आपल्याला कव्हा परवडला?

पण रातीतून तंबाखुचे बार लावतं

केलेला अभ्यास आता कामी आला..

डि.एड. करुन बी विनाअनूदानीतवर कामं...

त्यापेक्षा गावची ढोरं बरी वाटायची

अन् आपल्याजवळ कुठले पंधरा लाखं...

ज्याच्याजवळ होते ते चिकटले कायमचे...

सोय-यायसाठी अन् कमाईसाठीच तर

ईथ संस्था निघतातं...

आपण मात्र घडवायचे विद्यार्थी...

एकदा अनूदानीतवर लागू दे.

भरल्या पोटानं आनंदान जगू दे..
महेंद्र गौतम

हट्ट

अरे ईकडे ये
अंकलला ट्विंकल ट्विंकल म्हणून दाखवं....
अगं ते गाणं म्हणं बरं...
हिला सारेगमात पाठवायचयं जिंकेल ना?
बघा किती छान नाचतो ना...
टिव्हीवर दिसायला पाहिजे...
आम्हीतर एव्हढे पैसे भरुन
त्याला क्रिकेट अकादमीत घातलं..
सर म्हणाले गट्स आहेत
20-20 नक्किच खेळेलं..
हि बघ तुझी नविन रॅकेट..
तुला सायना व्हायचं ना...?
याच तर सारखं कम्प्युटर कम्प्युटरं..
ईतकं कळत ना आताचं त्याला..
कम्प्युटरचा जिनिअस होईलं नक्की..
अरे मातिचं भांड कसं फुटल तुझ्यानं.?
आता लहान आहेस का? सव्वापाच वर्षाचा झालास ना..!!!
तुला कळत नाही का?
मातित हात घालू नये जर्म्स असतातं..
चल हँडवाँश घे...
पाण्याच्या डबक्यात पाय घालू नये..
असं पाणि उडवतं चालू नये...
कुत्र्याची शेपुट ओढू नकोसं..
प्लँस्टिकचा असला तरी...
किती रे चाँकलेट मागतोस...
फर्स्ट स्टँडर्डला गेलास ना...
आता लहान मुलासारखा हट्ट नाही करायचा...
महेंद्र गौतम..


ललीत...

एकदा गावच्या डोंगरावर भटकतांना मला एका भल्यामोठ्या दगडावर एक झाडं उगवलेलं दिसलं, जवळ जाऊन बघतो तर गंमतच होती. अगदी जराशीच माती त्या दगडावर, कुठूनतरी येऊन ते बिजं त्यात रुजल असावं. मी विचार केला या झाडाचं आयुष्य किती?
पण एकाएकी तरारुन आलेल्या त्या हस-या झाडाचं हिरवेपण बघून अगदीच रोमांचीत झालो. कदाचीत ते झाड म्हणत असावं दगडाशी झुंजून थकेस्तोवर तरी भरभरायचं नंतर भलेही सुकून जाऊ..
रुजण्यापूरती माती आहे, हवा आणि ओल आहे मग कशाची वाट बघायची? चला रुजुयातं...
खरतरं पानगळ कष्टप्रदच. अश्या पानगळीच्या काळात सोबतीची पाखरंही उडून जातात, ज्याची त्यानेच सोसायची असते भयाण पानगळं.
एखादा सामान्य माणूस किंवा नावाजलेल व्यक्तिमत्व प्रत्येकालाच पानगळीतून जावं लागतंच. पण तश्या विदीर्णावस्थेत स्वतःला टिकवुन ठेवणं उद्याच्या बहराची वाट पाहत त्या असह्य झळा सोसत जाणं. जिकीरीचच कामं. पण तश्या एकाकीपणात कुठूनतरी चार दवाचे थेंब मिळतात अन् नवपालवीच स्वप्न अजून गर्द होत जातं..
पूर्वी ढ कॅटॅगिरीत मोडल्या गेलेला आणि आता मात्र स्वतःच्या गावची अख्खी बाजारपेठ काबिज करणारा माझा एक चिक्कार यशस्वी मित्र..
मध्यंतरी त्याला भेटायचा योग आला त्याचे शब्द अजून रुंजी घालतात. "आयला काहिच नव्हत रे हातात हिंमतीशीवायं...!!
आज तो ऐन बहरात आहे पण त्यानेही पानगळ सोसलीच ना?
शेवटी ज्याच्यात कळा आणि झळा सोसायची धम्मकं आहे त्याच हिरवेपण कुणीच हिरावू शकतं नाही.. नाही का?
महेंद्र कांबळे.

तिच्या अस्वस्थ उशाशी..

तिच्या अस्वस्थ उशाशी..
एक अपराधी चंद्र
काही मोडकी नक्षत्रं
चारदोन ओले श्वासं...
अर्धवट सांजवेळा
काही जिवघेण्या कातरवेळा....
आईचे रापलेले हातं
बुडाशी डागलेला भातं...
कशी जुळवून घेत असेलं..?
डोळ्यातल पाणी लपवतं
नव-याशी कसं हसत असेल?
घुसमटतही असेलं...
धुसफूसतही असेलं...
त्याच्या नावाचं कुंकू लावतांना...
जरा बिचकतही असेलं..
काय केलं असेल बिचारीनं..
त्या असंख्य गज-यांच?
दरवर्षी न चुकता मिळालेल्या
टपोर गुलाबांच....?
निर्माल्यं..!!! अजून काय?
तिच्या अस्वस्थ उशाशी...
एक किर्र मध्यरात्रं...
अन् अंधारात हरवलेल एक स्वप्नं...
तृप्तातृप्ततेच्या मध्यावरं..
त्याच्या शेजारी पहूडलेलं
तिचं अचेतन शरीरं...
महेंद्र कांबळे.

मरण सोहळा

कुणी स्वतःच स्वतःचं मरण निवडत असेल का?
निट विचार करुन आता बस, जे मिळवायचं ते मिळवलं जगण्याचा हेतू पुर्ण झाला, आता आपण समाधानान मरायला हवं असं कुणाला वाटू शकतं का?
मला वाटतं वाटत असावं, पण सामान्य लोकांच्या आकलन कक्षेच्या पलीकडल्या लोकांना.. ज्यांना जगण्या-मरण्याच्याही पलिकडे बघण्याची नजर मिळालीय..
विचार करा काय सुखावह भावना असेल त्यांची एकदम तृप्त तृप्त मरणं.... एखाद्या संतानं समाधी घेणे किंवा एखाद्या नावाजलेल्या कलाकाराने आत्महत्या करणे....!!!
महेंद्र कांबळे.

सजा....

(खरतर मातृभाषे व्यतिरिक्त आपल्याला
दुस-या कुठल्या भाषेत काही सुचेल असं स्वप्नात देखील मला वाटल नव्हतं. पण सुचल त्याला नाईलाज आहे, असंख्य चुकांसहित मी हिंदीत पहिल्यांदाच लिहिलेल काहितरी त्यावर कुणाचा प्रभाव आहे कि काय माहित नाही.)
सजा....
समेट के रखे है दामन मे
कुछ एहसानपरस्त पल
कुछ सपनोसे भरे कल
कुछ तेरी मनचली बाते
कुछ चुराई हुई मुलाकाते
सबसे छुपाकर रख लिये थे मैने झोली मे
चाँद के चंद टुकडे...
संभालकर रखा है तेरी हर रुसवाई को...
और मेरा हर जर्रा रोशन करनेवाली
तेरी हर तिलमिलाती याद को...
तु आई खुशिया लेकर
जैसे रेगीस्तान मे भटके मुसाफिर को...
बरसात की चार बुँदे मिली हो...
बडी रुखीसुखी फिकी बेजानसी थी जिंदगी....
अब तेरा दर्द मुझे रोज जिंदा होने
का एहसास दिलाता है....
या खुदा, सच बोलने की
किसीको ऐसीभी सजा मिले....
की रोज कतरा कतरा....
वो मरता चले.....
(माही)
महेंद्र कांबळे..

चारोळी

बहरायची स्वप्न...
मी पानगळीत बघतो..
विदीर्णावस्थेत असा
भरभरुन जगतो...
महेंद्र कांबळे

पुस्तक - अधांतरी


शेवटची ओळ संपवुन पुस्तक मिटतांना कधी शहारलात का? खुप जणांनी खुपवेळा हा अनुभव घेतलाही असेलं..
ब-याच दिवसानंतर एक अस्सल कलाकृती हातात घावली... जयवन्त दळवी लिखीत मॅजेस्टिकची कांदबरी 'अधांतरी'..
भाऊसाहेबांची ययाती संपवल्यावर असाच अंगावर सुखद काटा आला होता...
मी दळविंना याअगोदर वाचलच नव्हतं पण पहिल्याच कांदबरीत या माणसान मला खिशात टाकलं.
पहिल्या ओळिपासून सुरवात केल्यावर सरळ शेवटावर आल्यावर कळतं की कांदबरी संपलीय.. ईतकी ओघवती आणि प्रवाही भाषा.. तुफान वेग आहे त्यांच्या शैलीतं कथा फुलवण्याचं मोहक तंत्र... फिदाच एकदम.
साऊ उर्फ सावित्री एका गवय्याची मुलगी तिची आई एका तबलजीचा हात धरुन पळुन जाते. वडिल त्या धक्क्याने लवकरच जातात मग तिची निपुत्रिक आत्या बायजी तिला सांभाळते. तरुण झाल्यावर कुणीही वळुन बघावं असं रुपं, त्या धास्तिनं दहावीनंतर पुढे बायजी तिला शिकुच नाही देतं. नंतर शामु नावाच्या प्राध्यापकासोबत तिचं लग्न होतं ब-यापैकी समंजस, अतिव प्रेम करणारा नवरा. असा सुखी संसार पण एक मुलगा झाल्यावर तिला जाहिरातीच्या कंपनीत नोकरी मिळते तिथं केटी नावाचा चमको बाँस येतो आणि तिच आयुष्य वेगळ्या वळणावर येतं तो तिला बढती देऊन पब्लिक रिलेशन ऑफिसर करतो.. ति त्याच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीकडे आपसुक ओढल्या जाते. त्याच्या प्रेमात पडते. आधी टिपीकल हाउस वाईफ असलेली ती मग प्रोफेशनच्या नावाखाली दारु पिणं, उत्तान कपडे, भडक मेकअप अश्या गोष्टित अडकत जाते. यात तिच्या नव-याची घुसमट होते मुलगा अबोल होऊन दुरावतो शेवटी ती
नव-याला सोडुन केटिसोबत राहते नंतर तोही तिला सोडुन निघुन जातो.. मग उरत एक भयंकर भकासलेपणं...
वाटणं आणि वाटत तसं करणं यात खुप फरक असतो. अनैतिक लैगींक आकर्षण वेळिच काबुत करायला हवं, नेहमीच भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही कारण काही मुल्य आपण मानली नाहित तर आपली गत कुत्र्यामांजरासारखी होईलं. लैंगीक सुख हा एकुण सुखाचा एक छोटा भाग आहे त्यावर मॅग्नीफाईंग ग्लास धरुन मॅग्निफाय करण्यात अर्थ नाही. विषयोपभोग हे त्याच तिव्रतेन पुरत नसतात आपलं भावनिक नात्यागोत्याच विश्व महत्वाचं ते पुढ जिवनाला रस, चैतन्य देतं. ती फुलं कधिच बावून जात नाहित किंवा त्यांचा रंग कधिच ऊडत नाही. संसार म्हणजे जुळवुन घेणं सांभाळुनं घेणं..
अधिक सुखाच्या हव्यासान शेवटी भयंकर एकाकीपणच वाट्याला येतं. अस बरच काही शिकवतं हे पुस्तकं..

क्रांती...


Thursday, January 3, 2013 at 6:54pm ·
आद्य शिक्षिका माता सावित्री यांची आज जयंती..
बा ज्योतिबाला पुरेपुर साथ देत समाजात क्रांती घडवणारी माता सावित्री.
तथापी फक्त मुलींना शिकविण्या बरोबरच अजुन एक फार मोठं कार्य त्यांनी केलयं.
पुर्वी बालविवाह प्रथा अस्तित्वात होती आणि तरुणपणीच वैधव्य येण्याचं प्रमाणही बरचं, विधवा पुनर्विवाह तर पापचं मानण्यात येई पण अश्या तरुण विधवांवर कित्येकवेळा घरातच लैगींक अत्याचार केल्या जाई आणि साहजिकच त्यावेळी गर्भनिरोधकं उपलब्ध नसल्यामुळं तिला एकतर आत्महत्या करावी लागे किंवा कसातरी चोरुन लपुन बाळाला जन्म दिल्यावर बाळाला फेकावं लागे..
अश्या दुर्दैवी मुलिंच्या बाळंतपणासाठी धावुन गेले ते बा ज्योतीबा आणि सावित्री. केव्हढी करुणा होती दोघ्यांच्याही उरात किती माणुसकी जपली त्यांनी.
खालच्या कवितेतुन माणुसकिचा तो पैलु मांडण्याचा प्रयत्न केलायं. माता सावित्रीला विनम्र अभिवादनं.
*क्रांती...
सागरगोट्या खेळायच्या वयात लग्न ठरलं
पोलकं परकर सोडुन मी
मग लुगडं पेहरलं..
दिसं सरले आनंदाने
मी झाले न्हातीधूती
पण हाय रे दैवा
अपघातीच गेला पती
तो काळचं असा होता
प्रत्येका बाईसाठी
वैधव्य घेऊन जगणं..
मरणचं जणू तिच्यासाठी
एक दिवस आभाळ कोसळलं..
एकटिला बघून दिरानं धरलं..
तोंड दाबून बुक्क्याचा मारं..
सोसला कैकवेळा अत्याचारं...
त्याचा अंकूर मग
पोटात वाढू लागला...
जिवं देण्यावाचुन मग
पर्यायचं नाही उरलां...
पण रुढीच्या छातिवर देउन पाय...
धावले बा ज्योतिबा
धावली सावित्रा मायं..
घेउन गेले घरी मला
जणू स्वतःचीच लेकं..
माझ्यासारख्याच पिडित तेथे
अजुन होत्या कैकं..
आईच्या ममतेन केलं
माझ बाळंतपणं..
कोमेजु नाही दिलं
बाळाचंही बाळपणं
धन्य बा ज्योतीबा
धन्य सावित्रा माई
आजची पिढी त्यांना
कशी विसरली बाई?
महेंद्र कांबळे.

संस्कृती...


सुंदर घरटं विणणारा सुगरणं...
मधूर तानं छेडणारा कोकीळं....
मंत्रमुग्ध नाच करणारा मोरं...
चटकदर रंग पुढे करणारा यःकिश्चित सरडा....
रेडझुंज तर अगदी पाच पाच दिवस चालते...
बाराशिंग्याच्या युध्दातं..
कुणी शिंग गमावत तर कुणी जायबंद होतं...
एखादा महाळ्या जिवालाच मुकतो...
सगळेच किती संयमित
कलात्मकतेनं आपापली मादी मिळवतातं...
म्हणजे......
बळजबरी ओरबाडण्याची संस्कृती....
फक्त माणसांतच आहे....
महेंद्र कांबळे.

हायकू....


वादळ वारा
अंगावर शहारा
भिजून गेलो....

रुप चांदवा
की आहेस चकवा
मोहून गेलो

ती विद्यूलता
रे अशी कडकता
विझून गेलो

जातांना दुर
आला डोळ्यांना पूरं
थिजून गेलो

आगीचा बाऊ
जवळ नको जाऊ
अजून गेलो....
महेंद्र कांबळे...

संधिप्रकाशात.........

मी असा संधिप्रकाशात उभा...

आणि तू दुरुन वाकुल्या दाखवतेसं...

हाताशी आली आली म्हणता....

अलगद हातुन

निसटतेसं....

अधांतरलो पुरता आता..

धरणी तर कधीच नव्हती

आता आभाळही पोरकं झालयं...

असा अर्धामुर्धा वसंत काय कामाचा...

चर्र करत उडुन जाणा-या गरम तव्यावर शिंपडल्या चार थेंबासारखा...

येशिल तर पुर्ण कायपालट घेउन ये....

नाहितर मृगजळाच्या मागे धावुन मरायला

एक वेडा तयारच आहे...

महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected