लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पुस्तक - अधांतरी


शेवटची ओळ संपवुन पुस्तक मिटतांना कधी शहारलात का? खुप जणांनी खुपवेळा हा अनुभव घेतलाही असेलं..
ब-याच दिवसानंतर एक अस्सल कलाकृती हातात घावली... जयवन्त दळवी लिखीत मॅजेस्टिकची कांदबरी 'अधांतरी'..
भाऊसाहेबांची ययाती संपवल्यावर असाच अंगावर सुखद काटा आला होता...
मी दळविंना याअगोदर वाचलच नव्हतं पण पहिल्याच कांदबरीत या माणसान मला खिशात टाकलं.
पहिल्या ओळिपासून सुरवात केल्यावर सरळ शेवटावर आल्यावर कळतं की कांदबरी संपलीय.. ईतकी ओघवती आणि प्रवाही भाषा.. तुफान वेग आहे त्यांच्या शैलीतं कथा फुलवण्याचं मोहक तंत्र... फिदाच एकदम.
साऊ उर्फ सावित्री एका गवय्याची मुलगी तिची आई एका तबलजीचा हात धरुन पळुन जाते. वडिल त्या धक्क्याने लवकरच जातात मग तिची निपुत्रिक आत्या बायजी तिला सांभाळते. तरुण झाल्यावर कुणीही वळुन बघावं असं रुपं, त्या धास्तिनं दहावीनंतर पुढे बायजी तिला शिकुच नाही देतं. नंतर शामु नावाच्या प्राध्यापकासोबत तिचं लग्न होतं ब-यापैकी समंजस, अतिव प्रेम करणारा नवरा. असा सुखी संसार पण एक मुलगा झाल्यावर तिला जाहिरातीच्या कंपनीत नोकरी मिळते तिथं केटी नावाचा चमको बाँस येतो आणि तिच आयुष्य वेगळ्या वळणावर येतं तो तिला बढती देऊन पब्लिक रिलेशन ऑफिसर करतो.. ति त्याच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीकडे आपसुक ओढल्या जाते. त्याच्या प्रेमात पडते. आधी टिपीकल हाउस वाईफ असलेली ती मग प्रोफेशनच्या नावाखाली दारु पिणं, उत्तान कपडे, भडक मेकअप अश्या गोष्टित अडकत जाते. यात तिच्या नव-याची घुसमट होते मुलगा अबोल होऊन दुरावतो शेवटी ती
नव-याला सोडुन केटिसोबत राहते नंतर तोही तिला सोडुन निघुन जातो.. मग उरत एक भयंकर भकासलेपणं...
वाटणं आणि वाटत तसं करणं यात खुप फरक असतो. अनैतिक लैगींक आकर्षण वेळिच काबुत करायला हवं, नेहमीच भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही कारण काही मुल्य आपण मानली नाहित तर आपली गत कुत्र्यामांजरासारखी होईलं. लैंगीक सुख हा एकुण सुखाचा एक छोटा भाग आहे त्यावर मॅग्नीफाईंग ग्लास धरुन मॅग्निफाय करण्यात अर्थ नाही. विषयोपभोग हे त्याच तिव्रतेन पुरत नसतात आपलं भावनिक नात्यागोत्याच विश्व महत्वाचं ते पुढ जिवनाला रस, चैतन्य देतं. ती फुलं कधिच बावून जात नाहित किंवा त्यांचा रंग कधिच ऊडत नाही. संसार म्हणजे जुळवुन घेणं सांभाळुनं घेणं..
अधिक सुखाच्या हव्यासान शेवटी भयंकर एकाकीपणच वाट्याला येतं. अस बरच काही शिकवतं हे पुस्तकं..

क्रांती...


Thursday, January 3, 2013 at 6:54pm ·
आद्य शिक्षिका माता सावित्री यांची आज जयंती..
बा ज्योतिबाला पुरेपुर साथ देत समाजात क्रांती घडवणारी माता सावित्री.
तथापी फक्त मुलींना शिकविण्या बरोबरच अजुन एक फार मोठं कार्य त्यांनी केलयं.
पुर्वी बालविवाह प्रथा अस्तित्वात होती आणि तरुणपणीच वैधव्य येण्याचं प्रमाणही बरचं, विधवा पुनर्विवाह तर पापचं मानण्यात येई पण अश्या तरुण विधवांवर कित्येकवेळा घरातच लैगींक अत्याचार केल्या जाई आणि साहजिकच त्यावेळी गर्भनिरोधकं उपलब्ध नसल्यामुळं तिला एकतर आत्महत्या करावी लागे किंवा कसातरी चोरुन लपुन बाळाला जन्म दिल्यावर बाळाला फेकावं लागे..
अश्या दुर्दैवी मुलिंच्या बाळंतपणासाठी धावुन गेले ते बा ज्योतीबा आणि सावित्री. केव्हढी करुणा होती दोघ्यांच्याही उरात किती माणुसकी जपली त्यांनी.
खालच्या कवितेतुन माणुसकिचा तो पैलु मांडण्याचा प्रयत्न केलायं. माता सावित्रीला विनम्र अभिवादनं.
*क्रांती...
सागरगोट्या खेळायच्या वयात लग्न ठरलं
पोलकं परकर सोडुन मी
मग लुगडं पेहरलं..
दिसं सरले आनंदाने
मी झाले न्हातीधूती
पण हाय रे दैवा
अपघातीच गेला पती
तो काळचं असा होता
प्रत्येका बाईसाठी
वैधव्य घेऊन जगणं..
मरणचं जणू तिच्यासाठी
एक दिवस आभाळ कोसळलं..
एकटिला बघून दिरानं धरलं..
तोंड दाबून बुक्क्याचा मारं..
सोसला कैकवेळा अत्याचारं...
त्याचा अंकूर मग
पोटात वाढू लागला...
जिवं देण्यावाचुन मग
पर्यायचं नाही उरलां...
पण रुढीच्या छातिवर देउन पाय...
धावले बा ज्योतिबा
धावली सावित्रा मायं..
घेउन गेले घरी मला
जणू स्वतःचीच लेकं..
माझ्यासारख्याच पिडित तेथे
अजुन होत्या कैकं..
आईच्या ममतेन केलं
माझ बाळंतपणं..
कोमेजु नाही दिलं
बाळाचंही बाळपणं
धन्य बा ज्योतीबा
धन्य सावित्रा माई
आजची पिढी त्यांना
कशी विसरली बाई?
महेंद्र कांबळे.

संस्कृती...


सुंदर घरटं विणणारा सुगरणं...
मधूर तानं छेडणारा कोकीळं....
मंत्रमुग्ध नाच करणारा मोरं...
चटकदर रंग पुढे करणारा यःकिश्चित सरडा....
रेडझुंज तर अगदी पाच पाच दिवस चालते...
बाराशिंग्याच्या युध्दातं..
कुणी शिंग गमावत तर कुणी जायबंद होतं...
एखादा महाळ्या जिवालाच मुकतो...
सगळेच किती संयमित
कलात्मकतेनं आपापली मादी मिळवतातं...
म्हणजे......
बळजबरी ओरबाडण्याची संस्कृती....
फक्त माणसांतच आहे....
महेंद्र कांबळे.

हायकू....


वादळ वारा
अंगावर शहारा
भिजून गेलो....

रुप चांदवा
की आहेस चकवा
मोहून गेलो

ती विद्यूलता
रे अशी कडकता
विझून गेलो

जातांना दुर
आला डोळ्यांना पूरं
थिजून गेलो

आगीचा बाऊ
जवळ नको जाऊ
अजून गेलो....
महेंद्र कांबळे...

संधिप्रकाशात.........

मी असा संधिप्रकाशात उभा...

आणि तू दुरुन वाकुल्या दाखवतेसं...

हाताशी आली आली म्हणता....

अलगद हातुन

निसटतेसं....

अधांतरलो पुरता आता..

धरणी तर कधीच नव्हती

आता आभाळही पोरकं झालयं...

असा अर्धामुर्धा वसंत काय कामाचा...

चर्र करत उडुन जाणा-या गरम तव्यावर शिंपडल्या चार थेंबासारखा...

येशिल तर पुर्ण कायपालट घेउन ये....

नाहितर मृगजळाच्या मागे धावुन मरायला

एक वेडा तयारच आहे...

महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected