लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

आत्ममग्न कविता 5


या गावचा किंवा त्या गावचा
तू पडू नयेस माझं गावं शोधायच्या भानगडीत
मला सगळी गावं आताशा माझीच वाटू लागलीयेत..
कारण इकडे जातीयतेतून कुणाला सपासप कापताना
बघितल्यावर जेव्हढा अस्वस्थ होतो
तेव्हढच दुःख होत मला  शेजारच्या मुलांचा
हकनाक गेलेला बळी पाहून..
आणि जराभर अजिबात करमत नाही
एका गोऱ्याने अंदाधूंद फायरिंगने
काही काळ्यांना संपवलेल पाहून.
एखाद्या पाडयात नुकतंच जन्मलेल तान्हूल मूल
किंवा कुठे आडरानात उमललेल गंधूल फूल
मला दोघांकडही बघून हर्षान नाचावसं वाटतं..
शेवटी सगळ्या नद्यांच पाणी सागरालाच जाऊन मिळत...
म्हणूनच तू पडू नयेस माझ गावं शोधायच्या भानगडीत
कारण आताशा मला सगळी गावं माझीच वाटू लागलीयेत....

महेंद्र गौतम

पाऊस जरा येता

पाऊस जरा येता छळतो तुझा अबोला
कोठे ढगास वेड्या कळतो तुझा अबोला

हा राग आग मिरची अन नाक लाल शेंडा
मी काय करू ज्याने पळतो तुझा अबोला??

हो तूच खरी बाई मान्यं जेंव्हा करतो
तेंव्हाच गड्या कोठे टळतो तुझा अबोला

पाहून कुणासंगे कोणास चालतांना
माझ्या मनात तेंव्हा जळतो तुझा अबोला....

सय दाटते तुझी अन रात्रं वैरी होते
डोळ्यांमधून माझ्या गळतो तुझा अबोला..

महेंद्र गौतम

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected