लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

जायचे निघूनी भोगल्यावर..

डुंबूनी डोळ्यात जावे भेटल्यावर
तेव्हढा अधिकार उरला ना तुझ्यावर

वेदना आपसूक बोलू लागते
शेवटी पर्याय नसतो झिंगल्यावर

मी उगा स्मरतो जुन्या वेड्या क्षणांना
केव्हढा ओशाळतो तूज पाहिल्यावर

टाळूनी तुजला जरी जातो पुढे
हुंदका दाटून येतो थांबल्यावर

घे पुन्हा आवरून सारा हा पसारा
जायचे आहे निघूनी भोगल्यावर...

महेंद्र गौतम..

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected