लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

माणसानं...

माणसानं.....
1.

माणसानं पकडू नयेत मासे
पाण्यात विष टाकून..
किंवा गळ आणि जाळं टाकून
करू नये फितुरी.

पाण्यातले मासे लढू शकतं नाहीत
जमिनीवरच्या कावेबाज माणसांशी

माणसानं सताड शिरावं प्रहावात
अन खुशाल पकडावेत मासे
मोकळ्या हाताने

मुकाबला बरोबरीचा हवा...

2.
माणसानं भूक असेल तेव्हढंच
घ्यायला हवं वाढून.
खरतर तोडू नये झाडाचं फळ सुद्धा
फक्त गोळा करावेत
आपोआप गळून पडलेली फळं.

उगीचच उगवत बसला माणूस
धान्यसुद्धा जमीनीतून
एव्हढं विपुल अन्न
आजूबाजुला उपलब्ध असतांना..

माणूस जन्मण्या अगोदर
बुद्धं जन्मायला हवा होता..

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected