लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

शिताफी

तू म्हणालीस दोन्ही हात पसरुन
माणसानं चिरंतन प्रकाशाला कवटाळलं पाहिजे.
मी म्हणालो, अंधार हाच असतो शाश्वत.
कारण अंधार असतो तेंव्हा तिथे प्रकाश नसतो,
पण प्रकाश असतो तेंव्हाही तिथे अंधार असतोच असतो.
तू म्हणालीस आपणं सगळी सूर्याची लेकरं,
तेंव्हा का म्हणून नकारात्मक राहायचं?
हुशार आहेस किती शिताफीनं
मला युगायुगापासून सूर्यचं नाकारणाऱ्या
व्यवस्थेबद्दल बोलणं टाळतेस...

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected