नानाचा पकपकपकाक नावाचा मराठी सिनेमा आहे
पाड्यापाड्यावर जाऊन सचोटीनं लोकांची सेवा करणारा एक वैदू.
त्याची सुंदर बायको एक लेकरू प्रसंगी घराकडं दुर्लक्ष करून
रुग्णाच्या हाकेला अर्ध्यारात्री धावत जाणारा भला माणूस,
एका माजोरड्या धनदांडग्याच्या पोराच्या कसल्याश्या आजारासाठी
त्याला बोलावतात दवापणी करून सगळं समजावून सांगून घरी येतो.
रात्री एक म्हातारी लांबून चालत आलेली,तिच्या नवऱ्याला साप चावलेला
म्हणून तिला पाठकुळी घेऊन तिच्या पाड्यावर जायला निघतो
इतक्यात काही माणसं येऊन वाड्यावर चल म्हणतात,
तो नकार देतो आणि पाड्यावर जाऊन म्हातारीच्या नवऱ्याला वाचवतो
घरी येऊन बघतो तर त्याच घर जळत असत आत बायको
टाहो फोडत असते याला बेदम मारून बेशुद्ध करतात
शुद्धीवर येऊन वैदू बघतो त्याचं बेचिराख झालेलं घर आत भाजून कोळसा झालेली बायको आणि मुल
तो आकांत करतो आणि धावत सुटतो रडत रडत पळत सुटतो जंगलाच्या दिशेनं
आणि मग राहायला लागतो जंगलात 'भुत्या' म्हणून
माणसाच्या वस्तीच्या दूर एकटाच. जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यात याची दहशत बसते
भुत्याच जंगल होतं.
गेली कित्येक महिने मला वाटतंय असंच भुत्या होऊन दूर निघून जावं
माणसाच्या वाऱ्यालाही थांबू नये जंगला बिंगलात मरण येईपर्यंत जगावं
इथं जगण्यासारखं काही उरलंच नाही, श्वास गुदमारतोय
सगळीकडं भयानक रानटीपणा माजलाय.
भयानक चाललंय चौफेर. ऑक्सिजन अभावी निरागस लेकरं मरतायत,
खरं बोलणाराचे बिनदिक्कत मुडदे पाडल्या जातायत, गायप्रेम
देशप्रेमाला ऊत आलाय. बलात्कारी चमडी बाबाच्या समर्थनार्थ
जाळपोळ होऊन बेकसुर माणसं मारल्या जातायत.
फेसबुक व्हाट्सअपचा अणुबॉम्ब होतोय कधी नव्हे इतकं रक्तपिपासू
आणि बिनडोक वातावरण झालंय, सगळीकडे भोसका भोसकी सत्तेसाठी लोकांचा
फिअर फॅक्टर कंट्रोल करण्याची चढाओढ, ट्रोलगिरी..
विषण्णता आणि टोकाची हतबलता, कमालीच्या वेगानं आपण हुकूमशाही आणि धर्मशाहीकडं चाललोत आज.
खरं लिहायची चोरी खरं बोलायची चोरी
जे चाललंय त्याचा त्रास होतोय म्हणजे लोकांच्या दृष्टीनं आपण चुतीया
भुत्या बनून जंगलात का निघून जाऊ नये??
#महेंद्र गौतम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा